युवा तबला वादक सोहम गोराणे याचा कलाश्री युवा पुरस्काराने होणार सन्मान पुणे : गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ यांच्या वतीने दरवर्षी देण्यात
पुणे : सध्या जगभरात युद्धग्रस्त परिस्थिती असल्याचे आढळून येत आहे. एकविसाव्या शतकातही सुरू असलेली युद्ध दुर्दैवी असून या परिस्थितीत
झी मराठीवर येत्या एप्रिल महिन्यापासून एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ‘दीपज्योती’. ही गोष्ट आहे प्रेमाने आपलूलकीने बांधलेल्या बहीण भावांच्या नात्याची ज्योती, तिच्या दोन बहिणी आणि भावाची. ज्योतीच्या परिवाराची कहाणी अशी कि ज्योतीचे वडील दारू प्यायचे, दारूतच त्यांनी स्वतःच्या आयष्याचं मातरें करून घेतलं आणि संपूर्ण जबाबदारी ज्योतीच्या मोठ्या भावावर म्हणजे अभिजीत वर येऊन पडली. लहान वयातच त्याला शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. या घरामध्ये पैसे हातात खेळत नसला तरी सद्धा आनंदाचं वातावरण आहे. ज्योतीला शिकून चांगली नोकरी करण्याची इच्छा आहे. तर दुसरीकडे आहे एक घरंदाज कुटुंब ज्याचे प्रमुख आहेत पुरुषोत्तम त्यांचे तीन मुलं स्वराज, दीप, विराज आणि सोबत असते आत्या. स्वराज पुरुषोत्तमची कार्बन कॉपी असनू त्याला आपल्या वडिलांचा शून्यातून उभा केलेला बिजनेस पुढे न्यायचाय. विराज मात्र स्वतःच्या नोकरीमध्ये आनंदी आहे. पण दीपचा त्याच्या वडिलांवर जास्त राग आहे. दीप लहान असताना त्याची आई गेल्याने आपल्या बायकोच्या मृत्यूला दीपचं जबाबदार आहे अशी पुरुषोत्तम यांची धारणा झाली. तेव्हापासून ते दीपचा तिरस्कार करतात. आई गेल्यानंतर दीपराज दारूच्या आहारी गेलेला आहे. गोष्ट सुरु होते तीच एका धक्कादायक घटनेने. जिथे एक मृत्यू होतो. एका क्षणात आनंदाला दुःखाचं ग्रहण लागत. तर कसे दीप आणि ज्योती भेटणार त्यांचा प्रवास कसा सुरु होणार हे बघणं मनोरंजक असणार आहे. मालिकेत दीप आणि ज्योतीच्या भूमिकेत प्रसाद जवादे आणि पूर्वा कौशिक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर डॉ. गिरीश ओक आणि सुहास परांजपे ह्यांच्यासुद्धा महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत. या मालिकेचं लेखन केलय अश्विनी अनगळ आणि सायली कुलकर्णी ह्यांनी तर संवाद लेखन केलय इरफान मुजावर यांनी, मालिकेचं दिग्दर्शन केलय अमित सावर्डेकर यांनी. तेव्हा बघायला विसरू नका नवी मालिका ‘दीप ज्योती’ १३ एप्रिलपासून दररोज रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
पुणे : एअरबीएनबीचा अलीकडेच प्रकाशित झालेला अहवाल ‘अनलॉकिंग महाराष्ट्र इव्हेंट इकॉनॉमीः पॉवरिंग टुरिझम अँड लोकल कम्युनिटीज‘ मध्ये अधोरेखित करण्यात आले की प्रवासाला वाढत्या प्रमाणात अनुभवांमुळे चालना मिळत असल्याने महोत्सव, क्रीडा कार्यक्रम आणि सांस्कृतिक उत्सव महाराष्ट्रभर पर्यटनाची मागणी आणि पर्यटकांच्या खर्चाला वेग देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र भारतातील कार्यक्रमकेंद्री प्रवासाचे प्रमुख केंद्र बनले आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणावरील उपक्रमांमुळे पर्यटकांमध्ये मोठी वाढ होऊ लागली आहे. २०२३ मधील विश्वचषक सामन्यांदरम्यान, महाराष्ट्रात राहिलेल्या पाहुण्यांमध्ये वार्षिक स्तरावर ५० टक्के वाढ झाली. त्याचबरोबर सामन्याच्या तारखांदरम्यान पर्यटकांच्या चेक–इनमध्ये ७५ टक्के वाढ झाली. तसेच जानेवारी २०२५ मध्ये मुंबईतील कोल्डप्लेच्या कार्यक्रमादरम्यान बुकिंगमध्ये १०० टक्के वाढ झाली आणि मैफिलीच्या तारखांदरम्यान पाहुण्यांच्या संख्येत १७० टक्के वाढ झाली. पर्यटकांनी या क्षणांचे ट्रिप्समध्ये रूपांतर केले. हा कल पुढे लोलापलूझा इंडिया २०२६ सारख्या उत्सवांमध्ये प्रतिबिंबित झाला, जिथे मुंबईतील बुकिंगमध्ये वार्षिक स्तरावर ५० पेक्षा जास्त वाढ झाली आहे. जानेवारीमधील सर्व बुकिंगपैकी ८० टक्यांपेक्षा जास्त बुकिंग महोत्सवाच्या आठवड्यात होते. अलीकडील सर्वेक्षणानुसार, तरुण भारतीय कार्यक्रमावर आधारित प्रवासावर अधिकाधिक खर्च करत आहेत. त्यातील प्रत्येक ट्रिपमध्ये सामान्यतः ५१,००० रुपये खर्च करतात आणि दहापैकी सहा प्रवासी त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या २१–४० टक्के संगीतावर आधारित प्रवासावर खर्च करतात. कॉन्सर्टच्या तिकिटावर खर्च केलेल्या प्रत्येक एक हजार रूपयांमागे अतिरिक्त १५०० – २००० रूपये पर्यटन अर्थव्यवस्थेत, निवास, वाहतूक आणि स्थानिक व्यवसायांमध्ये विभाजित होतात. एअरबीएनबीवरील खर्चाने २०२५ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत ८३.२ कोटी डॉलर्सपेक्षा जास्त योगदान दिले आणि विविध क्षेत्रांमध्ये २,२२,००० रोजगार निर्माण केले. एअरबीएनबीचे भारत आणि आग्नेय आशियाचे राष्ट्रीय प्रमुख अमनप्रीत बजाज म्हणाले, “कार्यक्रम वाढत्या प्रमाणात लोकांच्या प्रवास करण्याच्या पद्धतीला आकार देत आहेत आणि हे कसे दीर्घकाळ टिकते आणि अधिक स्थानिक आर्थिक घडामोडींमध्ये रूपांतरित होते हे महाराष्ट्र अनुभवतो आहे. “राज्य मोठ्या प्रमाणावरील कार्यक्रमांना आकर्षित करत असल्याने पर्यटकांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आणि अधिकाधिक समुदायांना पर्यटनाच्या वाढीत सहभागी होण्यासाठी व त्याचा लाभ घेण्यासाठी पुरेशी निवास व्यवस्था शक्य करणे महत्त्वाचे ठरेल.
पुणे : लखनौ, चंदीगड, भोपाळ, विशाखापट्टणम, बेंगळुरू, गुवाहाटी, कोलकाता, अहमदाबाद, तिरुवनंतपुरम, जयपूर, पटना, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, भुवनेश्वर आणि नवी दिल्ली
सणासुदीचे दिवस म्हणजे उत्सव, भेटवस्तू आणि वाढत्या खरेदी विक्रीचा काळ. ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही ठिकाणी आकर्षक सवलती, मर्यादित काळासाठी विक्री आणि
पुणे : भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची पुढची लाट टियर २-४ शहरांमधून ऑनलाइन येत आहे. अशा वेळेस विशेषत: सार्थक संपर्काच्या शोधात असणाऱ्या
मुंबई : फिलिप्स होम अप्लायन्सेसने फिलिप्स वनशेफ सादर करण्याची घोषणा आज केली. स्वयंपाकासाठी हे एक नावीन्यपूर्ण, सर्वसमावेशक स्मार्ट उपकरण असून, रोजचा स्वयंपाक सोपा
Internationally acclaimed Pan-India actress Sheena Chohan steps into the world of legendary painter Raja Ravi Varma with a striking four-image
