सांधे व हृदयाच्या आरोग्यासाठी वेळीच उपचार करवून घेण्याला भारतीयांनी प्राधान्य द्यावे, महेंद्रसिंग धोनीने केले आवाहन
मुंबई : वैद्यकीय साधने बनवणारी, जागतिक पातळीवरील भारतीय कंपनी मेरीलने #ट्रीटमेंटजरुरीहै अर्थात उपचार करवून घेणे गरजेचे आहे हे जनजागृती अभियान सप्टेंबर २०२२ मध्ये सुरु केले होते आणि ते अजूनही सुरु आहे. नितंब व गुडघे यासारखे मोठे सांधे, हृदय (एओर्टिक स्टेनोसिस आणि कोरोनरी आर्टरी आजार) यांच्याशी संबंधित विशिष्ट आजारांविषयी विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती पुरवून भारतीय नागरिकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. रुग्ण, त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती यांच्या दरम्यानचे अंतर दूर करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
डिजिटल, सोशल मीडिया आणि मायक्रो इन्फ्ल्यूएंसर्स यांना सहभागी करवून घेऊन राबवण्यात येत असलेल्या प्रचंड मोठ्या मार्केटिंग योजनेसह या अभियानाची व्याप्ती सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर या अभियानाला १० मिलियनपेक्षा जास्त इम्प्रेशन्स मिळाले असून, ११ महिन्यांमध्ये प्रिंट व टेलिव्हिजनमार्फत संपूर्ण भारतभर जवळपास २० मिलियनपेक्षा जास्त ओटीएस (OTS) निर्माण केले आहेत.
या अभियानात महेंद्रसिंग धोनी सहभागी झाले असून, घरी वृद्धांची काळजी घेत असताना त्याला करुणेचा परिपूर्ण स्पर्श असावा हे दाखवून देत आहेत. ‘उपचार आवश्यक आहेत आणि सोपे देखील’ हा महत्त्वाचा संदेश महेंद्रसिंग धोनी यांनी सर्व प्लॅटफॉर्म्सवरून सर्व वयोगटातील प्रेक्षकांपर्यंत अतिशय प्रभावीपणे पोहोचवला आहे.
मेरीलचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजीव भट यांनी सांगितले, “निरोगी जीवन जगण्याकडे देशवासियांचा कल वाढत आहे, अशावेळी हृदय व हाडांना होणाऱ्या, असंसर्गजन्य आजारांवरील उपचार योजना आणि त्यांना आळा घालण्याचे उपाय याविषयी सर्वाधिक शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध झालेल्या दृष्टिकोनासह देशातील जनतेला साहाय्य प्रदान करणे खूप महत्त्वाचे आहे. ‘ट्रीटमेंट जरुरी है’ सारख्या उपक्रमांमुळे लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. #TreatmentZarooriHai मार्फत आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून, त्यांना आजारांचे निदान व त्यावरील उपचार वेळीच करून घेण्याचे महत्त्व पटवून देऊ इच्छितो. यामध्ये आम्ही एकात्मिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करत आहोत, त्यामुळे रुग्णांच्या (सर्वसामान्यतः ४० वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या) बरोबरीनेच त्यांच्या कुटुंबातील डिजिटल जाणकार असलेली मुले, नातवंडे यांच्याशी देखील संपर्क साधू शकत आहोत.”
राष्ट्रीय हाडे व सांधे दिवसाच्या निमित्ताने सांधेदुखीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. जसजसे वय वाढत जाते, खासकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी गंभीर सांधेदुखीमुळे शारीरिक हालचाली करणे कठीण होऊन बसते, याचा विपरीत परिणाम त्यांच्या दिनचर्येवर, रोजच्या कामांवर होतो. सर्वसामान्यतः ऑस्टिओआर्थरायटिस, ऱ्हेउमटोइड आर्थरायटिस आणि सांध्यांमधील दुखापती या समस्या वयोमानापरत्वे उद्भवतात.
ऑस्टिओआर्थरायटिस (ओए) हा दीर्घकाळपर्यंत त्रास देत राहणारा आजार असून आज जगभरातील लाखो लोक याने ग्रस्त आहेत. जवळपास १५ कोटी भारतीयांना (ज्यांच्यापैकी बहुतांश ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत) गुडघ्यांचा काही न काही आजार आहे. कुटुंबात अधिक कोणाला तरी गुडघ्याचा आजार असणे, वयोमानामुळे होणारी झीज, शारीरिक हालचालींचा अभाव, स्थूलपणा, जीवनशैलीमुळे होणारे आजार आणि दाह निर्माण करणारे आजार ही यामागची काही कारणे आहेत. भारतात दरवर्षी २.५ लाखांपेक्षा जास्त व्यक्ती टोटल नी रिप्लेसमेंट अर्थात संपूर्ण गुडघ्याचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करवून घेतात ही बाब जरी खरी असली तरी आजही अनेक लोक गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेला घाबरतात. पण वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे उपचारांचे अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत, यामध्ये रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटचा समावेश आहे ज्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिसवरील उपचार पद्धतींमध्ये क्रांती घडून आली आहे.
