Monday, May 25, 2026

Day: March 27, 2026

BusinessLatest News

एअरबीएनबी ने महाराष्ट्राची भारताचे ‘इव्हेंट टुरिझम’ केंद्र म्हणून होत असलेली वाढ केली अधोरेखित

पुणे : एअरबीएनबीचा अलीकडेच प्रकाशित झालेला अहवाल ‘अनलॉकिंग महाराष्ट्र इव्हेंट इकॉनॉमीः पॉवरिंग टुरिझम अँड लोकल कम्युनिटीज‘ मध्ये अधोरेखित करण्यात आले की प्रवासाला वाढत्या प्रमाणात अनुभवांमुळे चालना मिळत असल्याने महोत्सव, क्रीडा कार्यक्रम आणि सांस्कृतिक उत्सव महाराष्ट्रभर पर्यटनाची मागणी आणि पर्यटकांच्या खर्चाला वेग देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र भारतातील कार्यक्रमकेंद्री प्रवासाचे प्रमुख केंद्र बनले आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणावरील उपक्रमांमुळे पर्यटकांमध्ये मोठी वाढ होऊ लागली आहे. २०२३ मधील विश्वचषक सामन्यांदरम्यान, महाराष्ट्रात राहिलेल्या पाहुण्यांमध्ये वार्षिक स्तरावर ५० टक्के वाढ झाली. त्याचबरोबर सामन्याच्या तारखांदरम्यान पर्यटकांच्या चेक–इनमध्ये ७५ टक्के  वाढ झाली. तसेच जानेवारी २०२५ मध्ये मुंबईतील कोल्डप्लेच्या कार्यक्रमादरम्यान बुकिंगमध्ये १०० टक्के  वाढ झाली आणि मैफिलीच्या तारखांदरम्यान पाहुण्यांच्या संख्येत १७० टक्के  वाढ झाली. पर्यटकांनी या क्षणांचे ट्रिप्समध्ये रूपांतर केले.  हा कल पुढे लोलापलूझा इंडिया २०२६ सारख्या उत्सवांमध्ये प्रतिबिंबित झाला, जिथे मुंबईतील बुकिंगमध्ये वार्षिक स्तरावर ५० पेक्षा जास्त वाढ झाली आहे. जानेवारीमधील सर्व बुकिंगपैकी ८० टक्यांपेक्षा जास्त बुकिंग महोत्सवाच्या आठवड्यात होते. अलीकडील सर्वेक्षणानुसार, तरुण भारतीय कार्यक्रमावर आधारित प्रवासावर अधिकाधिक खर्च करत आहेत. त्यातील प्रत्येक ट्रिपमध्ये सामान्यतः ५१,०००  रुपये खर्च करतात आणि दहापैकी सहा प्रवासी त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या २१–४० टक्के  संगीतावर आधारित प्रवासावर खर्च करतात. कॉन्सर्टच्या तिकिटावर खर्च केलेल्या प्रत्येक एक हजार रूपयांमागे अतिरिक्त १५०० – २००० रूपये पर्यटन अर्थव्यवस्थेत, निवास, वाहतूक आणि स्थानिक व्यवसायांमध्ये विभाजित होतात. एअरबीएनबीवरील खर्चाने २०२५ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत ८३.२ कोटी डॉलर्सपेक्षा जास्त योगदान दिले आणि विविध क्षेत्रांमध्ये २,२२,००० रोजगार निर्माण केले. एअरबीएनबीचे भारत आणि आग्नेय आशियाचे राष्ट्रीय प्रमुख अमनप्रीत बजाज म्हणाले, “कार्यक्रम वाढत्या प्रमाणात लोकांच्या प्रवास करण्याच्या पद्धतीला आकार देत आहेत आणि हे कसे दीर्घकाळ टिकते आणि अधिक स्थानिक आर्थिक घडामोडींमध्ये रूपांतरित होते हे महाराष्ट्र अनुभवतो आहे. “राज्य मोठ्या प्रमाणावरील कार्यक्रमांना आकर्षित करत असल्याने पर्यटकांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आणि अधिकाधिक समुदायांना पर्यटनाच्या वाढीत सहभागी होण्यासाठी व त्याचा लाभ घेण्यासाठी पुरेशी निवास व्यवस्था शक्य करणे महत्त्वाचे ठरेल.  

Read More
ENTERTAINMENTLatest News

एकीच्या काळजात ज्वाला सुडाची, तर दुसरीच्या मनात ज्योत प्रेमाची !

 झी मराठीवर येत्या एप्रिल महिन्यापासून एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ‘दीपज्योती’.  ही गोष्ट आहे प्रेमाने आपलूलकीने बांधलेल्या बहीण भावांच्या नात्याची ज्योती, तिच्या दोन बहिणी आणि भावाची. ज्योतीच्या परिवाराची कहाणी अशी कि  ज्योतीचे वडील दारू प्यायचे, दारूतच त्यांनी स्वतःच्या आयष्याचं मातरें करून घेतलं आणि संपूर्ण जबाबदारी ज्योतीच्या मोठ्या भावावर म्हणजे अभिजीत वर येऊन पडली. लहान वयातच त्याला शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. या घरामध्ये पैसे हातात खेळत नसला तरी सद्धा आनंदाचं वातावरण आहे. ज्योतीला शिकून चांगली नोकरी करण्याची इच्छा आहे. तर दुसरीकडे आहे एक घरंदाज कुटुंब ज्याचे प्रमुख आहेत पुरुषोत्तम त्यांचे तीन मुलं   स्वराज, दीप,  विराज  आणि सोबत असते आत्या. स्वराज पुरुषोत्तमची कार्बन कॉपी असनू त्याला आपल्या वडिलांचा शून्यातून उभा केलेला बिजनेस पुढे न्यायचाय. विराज मात्र स्वतःच्या नोकरीमध्ये आनंदी आहे. पण दीपचा त्याच्या वडिलांवर जास्त राग आहे. दीप लहान असताना त्याची आई गेल्याने आपल्या बायकोच्या मृत्यूला दीपचं जबाबदार आहे अशी पुरुषोत्तम यांची धारणा झाली. तेव्हापासून ते दीपचा तिरस्कार करतात. आई गेल्यानंतर दीपराज दारूच्या आहारी गेलेला आहे. गोष्ट सुरु होते तीच एका धक्कादायक घटनेने. जिथे एक मृत्यू  होतो. एका क्षणात आनंदाला दुःखाचं ग्रहण लागत. तर  कसे दीप आणि ज्योती भेटणार त्यांचा  प्रवास कसा सुरु होणार हे बघणं मनोरंजक असणार आहे. मालिकेत दीप आणि ज्योतीच्या भूमिकेत प्रसाद जवादे आणि पूर्वा कौशिक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर डॉ. गिरीश ओक आणि सुहास परांजपे ह्यांच्यासुद्धा महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत. या मालिकेचं लेखन केलय अश्विनी अनगळ आणि सायली कुलकर्णी ह्यांनी तर संवाद लेखन केलय इरफान मुजावर यांनी, मालिकेचं दिग्दर्शन केलय अमित सावर्डेकर यांनी. तेव्हा बघायला विसरू नका नवी मालिका ‘दीप ज्योती’ १३ एप्रिलपासून दररोज रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
Latest NewsPUNE

२८ वा कलाश्री पुरस्कार गायिका आरती अंकलीकर- टिकेकर यांना जाहीर

युवा तबला वादक सोहम गोराणे याचा कलाश्री युवा पुरस्काराने होणार सन्मान पुणे  : गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ यांच्या वतीने दरवर्षी देण्यात

Read More
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांवर भारताला ‘जगाचे गुरुस्थान’ मिळवून देण्याची जबाबदारी – पांडुरंग बलकवडे

  जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सदानंद अंचवल स्मृती पुरस्कारांचे वितरण पुणे : प्रतिनिधी एकेकाळी सुवर्ण भारत म्हणून ओळखला जाणारा देश पुन्हा

Read More
Latest NewsPUNE

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नियोजन बैठक संपन्न

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त आवश्यक नियोजनाबाबत पुणे महापौर दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

Read More
Latest NewsPUNE

रामनवमी निमित्ताने धायरी परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन

पुणे:   रामनवमीनिमित्त धायरी परिसरात भगवान श्रीरामांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत स्थानिक नागरिक, युवक व महिला मोठ्या उत्साहाने

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शासन व्यवस्थे’चा अंकुश न राहिल्यानेच भोंदूगिरीचे प्रस्थ वाढले…! गोपाळदादा तिवारी

  पुणे : राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्थेने’ म्हंटल्या प्रमाणे मानवी वर्तन व निर्णय प्रक्रियेत वैचारिक तर्क लावण्याचे प्रयत्न केले जात

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आरटीई कायद्यात सुधारणा करण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी  

पुणे  : राईट टू एज्युकेशन ॲक्ट, 2009 मध्ये आवश्यक सुधारणा करून शिक्षण व्यवस्था अधिक समावेशक, न्याय्य आणि प्रभावी करण्यासाठी नागरिक

Read More