Wednesday, May 6, 2026
BusinessLatest News

गोदरेज इंडस्ट्रीजचे स्वातंत्र्यदिनानिमित्त #AsYouWishIndia कॅम्पेन

मुंबई: भारताच्या ७६व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, भारतातील आघाडीचा, विविध व्यवसायक्षेत्रांमध्ये कार्यरत असलेला उद्योगसमूह गोदरेज इंडस्ट्रीजने #AsYouWishIndia ही   डिजिटल कॅम्पेन फिल्म प्रकाशित केली आहे. भारताच्या उत्क्रांतीच्या समांतर असलेला गोदरेज समूहाचा आजवरचा उल्लेखनीय प्रवास आणि सुरक्षा, निवारा, आर्थिक सहाय्य, आत्मविश्वास व इतर बरेच काही प्रदान करणाऱ्या अत्यावश्यक उत्पादने व सेवांद्वारे लाखो लोकांच्या जीवनात प्रगती घडवून आणण्याची बांधिलकी दर्शवणे या कॅम्पेनचा उद्देश आहे.

गोदरेज इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट ब्रँड व कम्युनिकेशन्स टीमने क्रिएटिव्हलॅन्ड एशियाच्या सहयोगाने या फिल्मची संकल्पना तयार करून ती अंमलात आणली आहे. अधिक मजबूत व अधिक आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचे एक व्हिजन पूर्ण करण्यासाठी विविध व्यवसाय विभागांकडून एकत्रितपणे केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा सन्मान या फिल्ममध्ये करण्यात आला आहे. गेल्या अनेक दशकांपासून गोदरेज इंडस्ट्रीजवर विश्वास ठेवून, विसंबून असलेल्या, गोदरेज इंडस्ट्रीजच्या अनेक उत्पादनांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवणाऱ्या लाखो भारतीय ग्राहकांप्रती कृतज्ञता #AsYouWishIndia कॅम्पेनमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

या कॅम्पेनबद्दल गोदरेज इंडस्ट्रीजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व चीफ ब्रँड ऑफिसर श्रीमती तान्या दुबाश यांनी सांगितले, “भारताचा ७६वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, आपल्या देशाच्या अतुलनीय वाटचालीचा एक भाग असल्याचा आणि आमच्या नाविन्यपूर्ण उत्पादने व सेवांमार्फत प्रत्येक भारतीयाला सक्षम बनवण्याची संधी लाभल्याचा गोदरेज इंडस्ट्रीजला अतिशय अभिमान वाटत आहे. प्रत्येक भारतीयांची स्वप्ने व महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात आम्ही देत असलेले योगदान आणि आमच्या देशबांधवांच्या जीवनात सार्थक परिवर्तन घडवून आणण्याचे आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न आम्ही #AsYouWishIndia फिल्ममध्ये दर्शवत आहोत.”

क्रिएटिव्हलॅन्ड एशियाचे सह-संस्थापक व क्रिएटिव्ह व्हाईस चेअरमन अनु जोसेफ यांनी सांगितले, “गोदरेज इंडस्ट्रीजने त्यांच्या आजवरच्या प्रवासात सातत्याने, नियमितपणे केलेली एक लक्षणीय बाब म्हणजे भारताच्या इच्छा व गरजा समजून घेऊन पूर्ण करणे. #AsYouWishIndia. भारताच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या या सुंदर वाटचालीचा आनंद साजरा करण्यासाठी भारताचा ७६वा स्वातंत्र्यदिन हा सर्वोत्कृष्ट आणि सर्वात योग्य दिवस आहे असे आम्ही मानतो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading