अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी देशसेवा करा :अंकल सोनावणे
लोकजनशक्ती पक्षातर्फे संसदेत तैलचित्र लावण्याची मागणी
पुणे, दि. १ – लोकजनशक्ती पक्षातर्फे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना जन्म शताब्दीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पक्षाच्या पुणे शहर जिल्हा शाखेच्या वतीने साधू वासवानी चौकातील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अण्णा-भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
‘महापुरुषांच्या कार्याचे उत्सव होत राहिल्यानेच गाव कुसाबाहेर राहणाऱ्या समाजापर्यंत विचार पोहोचले .दोन पिढ्या या विचारांनी प्रेरित होऊन प्रगतीची वाट चालू लागल्या.सुशिक्षितांचे प्रमाण अण्णाभाऊ साठे यांच्या सारख्या महापुरुषांच्या विचारांच्या प्रबोधनामुळे वाढले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे तरुणांनी मंथन करावे आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गाने देशसेवा करावी,’असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अंकल सोनावणे यांनी केले .
अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि संसंदेत तैलचित्र लावण्याची मागणी प्रदेश सचिव अण्णासाहेब कांबळे यांनी आपल्या भाषणात केली .
या वेळी पक्षाच्या पुणे शहर जिल्हा शाखेचे अध्यक्ष संजय आल्हाट, प्रदेश सचिव अण्णासाहेब कांबळे, प्रवक्ते के सी पवार, माधव यादव, आपासाहेब भोसले, महिला आघाडीच्या सविता रणदिवे, संजय चव्हाण, हिमेश पाडियार, अर्जुन गायकवाड, सुनील शेलार , अतुल देवकुळे ,संतोष शिंदे ,संजय भोसले ,आदिनाथ भाकरे ,राहुल उभे ,बचैतन्य खाडे , निखिल जायभाय उपस्थित होते.