Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

विदर्भाला दिलासा; पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा

पुणे प्रतिनिधी :
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्णतेने होरपळणाऱ्या विदर्भातील नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांत विदर्भात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा विशेष इशारा देण्यात आला असून, विदर्भातील इतर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आदी १५ राज्यांमध्येही पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये आधीच पावसाने आणि वादळी हवामानाने जनजीवन विस्कळीत झाले असून, देशातील सहा राज्यांमध्ये गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. उत्तर तामिळनाडू किनारपट्टी आणि आसपासच्या भागात निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे हवामानात मोठे बदल होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि खराब हवामानाच्या काळात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading