fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

गुजराती विरुद्ध मराठी वाद पुन्हा आला चव्हाट्यावर.. घाटकोपर मध्ये इमारतीत शिवसैनिकांना रोखले..

 

मुंबई – ईशान्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील घाटकोपर मधील एका सोसायटीत पुन्हा एकदा गुजरात्यांचा मराठी द्वेष समोर आला आहे. महाविकासआघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे प्रचार पॅम्प्लेट वाटण्यासाठी इमारतीत जाऊ पाहणाऱ्या मराठी शिवसैनिक महिला व पुरुष कार्यकर्त्यांना तेथील गुजरात्यांनी मज्जाव केला. बऱ्याच वादावादी नंतर, पोलिसांच्या मध्यस्थी मुळे केवळ दोन जणांनाच आत जाण्याची परवानगी देण्यात आली. या सर्व प्रकारामुळे काही गुजराती नागरिकांमध्ये मराठी द्वेष किती भरला आहे हे पुन्हा एकदा समोर आले.
“मिनी पाकिस्तान” “मिनी बांगलादेश” “टोपीवाले गुंड” अशी शेलकी भाषा वापरल्यामुळे आतापर्यंत भाजपचा मुस्लिम द्वेष्टा चेहरा समोर येत होता परंतु काही गुजरात्यामध्ये मराठी द्वेष किती भरलेला आहे हे घाटकोपर मधील ताज्या घटनेने समोर आले आहे. घाटकोपर पश्चिम येथील माणिकलाल भागात असलेल्या समर्पण नामक गुजराती बहुल सोसायटीत सायंकाळी ८.३० च्या सुमारास प्रचारासाठी गेलेल्या शिवसैनिकांना मज्जाव करण्यात आला. कारण विचारले असता, आपण भाजप चे पदाधिकारी असून त्यांनाच मतदान करणार असल्याने तुम्हाला आत जाता येणार नाही असे सांगत दटावले. उपस्थित महिला व पुरुष शिवसैनिकांनी आपण केवळ पॅम्प्लेट द्यायला जात असून तुम्ही कोणालाही मतदान करा तो तुमचा अधिकार असल्याची विनवणी केली परंतु तरीही त्यांना आत सोडण्यात आले नाही. बराच वेळ अशाप्रकारे बाचाबाची झाल्यानंतर अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आलेत. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने केवळ दोन जणांना आत सोडण्यात आले. यामुळे शिवसैनिक आणि महाविकासआघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप पसरला असून पोलीस आणि निवडणूक आयोगाने असे प्रकार रोखण्यासाठी योग्य ते पाऊल उचलावे अशी विनंती केली. मराठी बहुल सोसायट्यांमध्ये अशाप्रकारे जाती धर्माच्या आणि भाषेच्या आधारावर कोणाला मज्जाव केल्याचे एकही उदाहरण समोर येत नाही परंतु गुजराती बहुल सोसायट्यांमध्ये असे प्रकार वारंवार पहायला मिळतात.
आत्तापर्यंत गुजराती बहुल सोसायट्या मध्ये मराठी माणसाला घर आणि दुकाने नाकारल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. परंतु लोकशाहीने आणि संविधानाने प्रत्येक उमेदवाराला दिलेला योग्य मार्गाने प्रचार करण्याचा हक्क देखील नाकारला जात असल्याने समाजात तेढ निर्माण होत असून याला वेळीच आला घालणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading