Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

अर्थसंकल्प 2024 : व्यावसायिकांच्या नजरेतून

 

श्री. अब्रारअली दलाल, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, सह्याद्रि हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड

“यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा देशातील सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी सरकारच्या समर्पणाचा पुरावा आहे. अधिक वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यावर भर असल्याने सध्याच्या रुग्णालयातील पायाभूत सुविधांचा इष्टतम वापर करण्यात आणि आरोग्य सेवेमध्ये दर्जेदार व्यावसायिक तयार करण्यात त्याची मदत होईल. या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबंधात्मक उपाय आणि आरोग्य कवच यांचा विस्तार, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लसीकरण आणि आयुष्मान भारत योजनेंतर्गत आशा आणि अंगणवाडी सेविकांना आरोग्य कवच वाढविण्यावर भर दिला जात आहे तो स्तुत्य आहे.

त्याशिवाय माता आणि बाल आरोग्य सेवा योजनांचे एका व्यापक कार्यक्रमात एकत्रीकरण, अंगणवाडी केंद्रांचे जलद अपग्रेडेशन आणि U-Win प्लॅटफॉर्मच्या रोलआउटसह, महिला आणि मुलांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सर्वांगीण दृष्टीकोन प्रतिबिंबित करते. हे उपाय, मिशन इंद्रधनुषच्या तीव्र प्रयत्नांसह, निरोगी आणि अधिक लवचिक भारताकडे प्रगतीशील झेप दर्शवतात.

मिशन इंद्रधनुष हे भारत सरकारचे एक महत्वाचे आरोग्य अभियान आहे, ज्याचा उद्देश मुलांसाठी 90% पेक्षा जास्त प्रमाणात संपूर्ण लसीकरण कव्हरेज प्राप्त करणे आहे. या मिशनचे उद्दिष्ट अर्थसंकल्प 2024 मध्ये नमूद केलेल्या सर्वसमावेशक आरोग्य सेवा दृष्टिकोनाला पूरक आहे, जे सक्रिय आरोग्य सेवा उपायांद्वारे सर्व नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करते.

यापूर्वी आरोग्यासाठी AI मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यावर भर असूनही यंदाच्या वर्षाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेमध्ये AI साठी कुठलीही विशिष्ट तरतूद नाही. त्यामुळे वैद्यकीय निदान आणि प्रगतीमधील AI च्या संभाव्यता दुर्लक्षित राहिल्या आहेत.”

 

आम्ही अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे दूरदर्शी अंतरिम अर्थसंकल्प २०२४ सादर केल्याबद्दल अभिनंदन करतोत्यांनी सर्वसमावेशक विकासाचा टप्पा निश्चित केला आहे. विशेषत: पंतप्रधान आवास योजना ग्रामीण याद्वारे पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण यावर लक्ष केंद्रित करून पुढील ५ वर्षात ३ कोटी घरे आणि आणखी २ कोटींचे नियोजन हे फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या शाश्वत समाजासाठीच्या बांधिलकीशी सुसंगत आहे. पीएम किसान सन्मान योजना आणि पीएम फसल विमा योजना यांसारखे शेतकरी-केंद्रित उपक्रम आपल्या ‘अन्न दाता’ प्रती सरकारची बांधिलकी दर्शवतात. फिनोलेक्स इंडस्ट्रीजला या उपक्रमांचे सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे. २०४७ पर्यंत समृद्ध आणि सक्षम भारतावरील आमचा विश्वास दृढ करून या परिवर्तनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास आम्ही उत्सुक आहोत,” 

असे फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अजित वेंकटरमण म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading