Tuesday, April 7, 2026
Latest NewsPUNE

Pune Festival : ऑल इंडिया मुशायरा ; रसिकांचा मोठा प्रतिसाद !!

पुणे : ३५व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘अखिल भारतीय मुशायरा’ या कार्यक्रमात अकोल्याचे शायर अबरार काशिफ यांनी सादर केलेल्या

 

       दर्द ए मोहब्बत, दर्द ए जुदाई दोनो को एक साथ मिला |

       तू भी तनहा, मै भी तनहा आ इस बात पे हाथ मिला ||

 

       गझल को इतने महेजोमे, इतना लहेजा पसंद आया |

       की शहजादी को एक मजदूर का बेटा पसंद आया ||

 

या अशा अनेक शायरींना रसिकांनी वाहवा.. वाहवा.. क्या बात है… म्हणत… वन्स मोर देत दिलेली दाद,  टाळ्यांचा कडकडाट,  तरुणाईने शिट्या वाजवून दिलेली दाद अशा जल्लोषपूर्ण वातावरणात ३५व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘अखिल भारतीय मुशायरा’ हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शुक्रवार( दि. 22 सप्टेंबर) पार पडला.

‘पुणे फेस्टिवल’ अंतर्गत ‘अखिल भारतीय मुशायरा’चे  डॉ.पी. ए. इनामदार(कुलपतीडॉ. पी.ए. इनामदार विद्यापीठपुणे) आणि श्रीमती आबेदा इनामदार (अध्यक्षडेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटपुणे) यांनी  आयोजन केले. यावेळी पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष अॅड. अभय छाजेड, डॉ.पी. ए. इनामदार(कुलपतीडॉ. पी.ए. इनामदार विद्यापीठपुणे) आणि श्रीमती आबेदा इनामदार (अध्यक्षडेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटपुणे) हे उपस्थित होते. शमारोषन (मेणबत्ती प्रज्वलन) करून मुशायरास सुरुवात झाली.,सामाजिक एकता व समता यांचे संदेश, रोमॅंटिक शायरी, अशा विविध शायरांनी वैविध्यपूर्णरित्या आपल्या शायरीतून दिले.त्यास प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.

यावेळी बोलताना अॅड. अभय छाजेड म्हणाले, माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी 35 वर्षांपूर्वी पुणे फेस्टिवलला सुरुवात केली. संपूर्ण देशात अशा प्रकारचा हा एकमेव फेस्टिवल झाला आणि त्यामुळे त्याला ‘मदर ऑफ ऑल फेस्टिवल’ म्हटले गेले. या फेस्टिवलमध्ये अखिल भारतीय मुशायराचे आयोजन केले जात असून तो एक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनला आहे

आबेदा इनामदार, म्हणाल्या, पुणे फेस्टिवलची सुरुवात माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी केली. त्यांनी सुरू केलेल्या या मिशनला आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. संपूर्ण जगाला माणुसकीचा,एकतेचा संदेश आपण अखिल भारतीय मुशायरा’ या कार्यक्रमातून जगाला देत असतो. आणि मला पूर्ण विश्वास  आहे की यामध्ये आपण यशस्वी होऊ.

मुशायरात डॉ. मंजर भोपाली (भोपाळ)डॉ. लता हया (मुंबई)अंजुम बाराबंकवी (लखनौ)अबरार काशिफ (अकोला)सरदार सलीम (हैदराबाद)सागर त्रिपाठी (वाराणसी)डॉ. कासिम इमाम (मुंबई) फरहान दिल (मालेगाव) अब्दुल हमीद हुनर, शाहनवाज काजी सईल, अब्दुल हमीद इनामदार, तन्वीर सोलापुरी हे सहभागी झाले होते. डॉ. कासिम इमाम यांनी सूत्रसंचालन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इक्बाल अन्सारी यांनी केले.

मालेगावहून आलेल्या फरहान दिल यांनी सादर केलेल्या

          सौ जख्म लगे है तो संभल कयू नही जाता, इस दिलसे मोहब्बत का खल्ल कयू नही जाता

          दिल लेके भटकता हू मै बाजारे वफा मे, ये इष्क को सिकका है तो चल क्यू नही जाता.. या

गझलला आणि

शाहनवाज काजी सईल यांनी सादर केलेल्या

                मुझे तुम भूल जाने मे जरासी देर तो करते

                नया रिश्ता बनाने मे जरासी देर तो करते

                मुझे फिर इष्क करना था, मुझे फिर दिल लगाना था.

                मुझे तुम याद आने मे जरा से देर तो करते…

                जरासी देर हो जाती तुम्हे पलके झुकाने मे, या फिर पलके उठाने मे , जरासी देर तो करते

                मोहब्बत नही सौदे की गुंजाईश मगर जाना, वफा को बेच आने मे जरासी देर तो करते….

               या गझलला रसिकांनी भरभरून दाद दिली.

रात्री उशिरापर्यंत ही मैफल रंगली होती. रसिक प्रेक्षकांनी खूप मोठी गर्दी केली होती.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading