Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

मणिपूर मध्ये तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, पीडित भगिनींना न्याय द्या – लुकस केदारी

पुणे :  मणिपूर येथील हिंसाचार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे .येथे तत्काळ अत्याचार थांबविण्यात यावेत ,पीडित भगिनींना न्याय देण्यात यावा व राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागनी आजच्या आंदोलनात रिजनल ख्रीश्चन सोसायटी चे नेते लूकस केदारी यांनी केली आहे .
पुढे ते म्हणाले की ,मितेई जमावाच्या भीषण जाळपॊळी व एकसारख्या हल्ल्यामुळे कुकींचे जीवन आणि मालमत्तेचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. मृतांची संख्या शेकड्यात पोहोचलेली आहे, तर २०० च्या वर गावे , वस्त्या वसाहती उद्ध्वस्त झालेली आहेत, शेकडो कुकी लॊक जखमी , २३० च्या वर चर्चेस उध्वस्त झाली, ४७०० च्यावर घरे जाळली गेली, वरील घटना लक्षात घेता, आम्ही मणिपूर सरकारच्या निष्क्रियतेचा तीव्र शब्दात निषेध करतो,
भगिनींना विवश्र करून अत्याचार व धिंड काढली गेली हा भारत देशाच्या संस्कृतीचा अपमान आहे, अशा प्रकारे कायदा सुविधा शाबूत ठेवण्यात मनिपूर सरकार अपयशी ठरले आहे त्याला बरखास्त करा राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा मागण्या रिजनल ख्रिश्चन सोसायटी चे अध्यक्ष प्रशांत केदारी यांनी निवेदनाद्वारे केले,
यावेळीआंदोलनाचे संयोजक लूकस कॅडरी , काँगेस पक्षाचे नेते मोहन जोशी, ख्रिश्चन फोरम चे पास्टर केळकर,नॅशनल कॉन्फेरंस मायनॉरिटी चे अध्यक्ष राहुल डांबाळे, अन्टोन कदम, जॉन मानतोडे, फादर रॉबिन मानतोडे,झुबेर मेमन, प्रमोद पारधे, फेबीयन सॅमसन, जॉन फर्नांडीस, माजी नगरसेविका अश्विनीताई लांडगे,रतन ब्राम्हणे, अलीस लोबो, प्रवीण मठायू यासह पुणे शहरातील विविध पक्ष संघटना व कार्यकर्ते तसेच ख्रीश्चन समाजातील महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading