“अधिक सक्षम महाराष्ट्र बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करू…’
उपमुख्यमंत्री पद स्वीकारताना सुनेत्रा पवार यांची ग्वाही
मुंबई प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. मात्र, त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवत अधिक सक्षम महाराष्ट्र बनवण्याचा सुरेखपूर प्रयत्न आपल्याकडून केला जाईल, अविवाहित महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. .
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर त्या बोलत होत्या.
अजित पवार यांची कार्यशैली, निर्णय क्षमता, कार्यक्षमता याची बरोबरी कोणी करू शकत नाही. मात्र, अजित पवार यांचे विचार, विकासाची दृष्टी जनतेबद्दल असलेली आत्मीयता ही कायमच आपल्यासाठी मार्गदर्शक ठरेल. अजित पवार यांची अपुरी स्वप्न पूर्ण करणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे याला आपला प्राधान्यक्रम राहील, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पदाची स्टेक हाती घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, धनंजय मुंडे या नेत्यांची पक्षाच्या आगामी रणनीतीबाबत चर्चा केली.
