महायुतीच्या उमेदवारांसाठी जीवाचे रान करणार – डॉ. तानाजी सावंत
धाराशिव : धाराशिव हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र, तरी देखील महायुतीकडून येथून राष्ट्रवादीला उमेदवारी देण्यात आली. मात्र, माझा धाराशीवच्या जानेतेवर पूर्ण विश्वास आहे. कारण तिकीट देणारे नेते असले तरी पण मत देणारी ही आमची मायबाप जनता आहे. यांच्या जोरावर आम्ही निवडून येत असतो, असा शब्दात पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप नेते राणा जगजितसिंग पाटील, बसवराज पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना तानाजी सावंत म्हणाले, धाराशिव लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या वतीने 26 जानेवारी 2024 पासूनच प्रचाराला सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर धाराशिव मधील अनेक नेते, आमदार, मुख्यमंत्री ,दोन उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी मिळून येथील उमेदवार निवडला मात्र तरी देखील हा हाडाचा शिवसैनिक खचला नाही. कोणत्याही जय पराजयाने खचणारा हा शिवसैनिक नाही. म्हणूनच आज पर्यंत धाराशिव जिल्हा हा कडवट शिवसैनिकांचा म्हणून ओळखला जातो. कोणापुढेही झुकणार नाही असा हा शिवसैनिकांचा बाणा आहे. शिवसैनिका पेक्षा कोणतेही पद मोठे नाही हे बाळासाहेबांची एक शिकवण आम्हाला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत धाराशिवमध्ये मतदान मशीन मध्ये धनुष्यबाण नसला तरी आम्ही प्राणपणाने महायुतीच्या उमेदवारांसाठी जीवाचे रान करणार आहोत.
दरम्यान, मागील 2014 ते 2024 पर्यंत जो भारतात विकास झाला तो नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्या भागातून त्यांच्या विचारांचा खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे. घड्याळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून अर्चना पाटलांना विजयी करा असे आवाहन सावंत यांनी केले.