fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त मातंग साहित्य परिषदेतर्फे ‌‘जागर महापुरुषांच्या विचारांचा’

पुणे : साम्राज्यशाही वृत्तीतून मुक्त होणे ही लोकमान्य टिळक यांची भूमिका होतीज्या मूल्यांचे जागरण लोकमान्यांनी केले त्यांची धुरा अण्णा भाऊ साठे यांनी पुढे वाहिलीआगरकर कर्ते सुधारक होतेते अज्ञेयवादी होतेअण्णा भाऊ साठे यांनी सर्वांना जोडणारीएकत्र नेणारीवेदनेचे उदात्तीकरण  करणारी साहित्य मांडणी केली असल्याने ते संपूर्ण राष्ट्राचे साहित्यिक आहेतटिळकआगारकर आणि साठे यांच्यातील मानवतावाद हा धागा समान आहेया महापुरुषांच्या सामर्थ्याची बेरीज जातीयवादा पलिकडे जाऊन करणे आवश्यक आहेअशा शब्दांत महनिय वक्त्यांनी महापुरुषांच्या विचारांचा जागर केला.

मातंग साहित्य परिषदेतर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकआद्य समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि साहित्यरत्न लोकशाहीर डॉअण्णा भाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त ‌‘जागर महापुरुषांच्या विचारांचा‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेसंत साहित्याच्या अभ्यासक डॉश्यामा घोणसेविवेक मासिकाचे सहसंपादक रवींद्र गोळेसंत साहित्याचे अभ्यासक डॉअभय टिळक हे प्रमुख वक्ते होतेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकवादी विचारवंत डॉश्रीपाल सबनीस होतेमातंग साहित्य परिषदेचे संस्थापकअध्यक्ष डॉधनंजय भिसेसंपत जाधवसंदिपान झोंबाडेभाऊसाहेब अडागळेडॉआंबादास सकटविसाजी लांडगे  व्यासपीठावर होतेभारतीय विचार साधना सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉश्रीपाल सबनीस म्हणालेटिळकांनी केवळ उच्चभ्रू जातीचे राजकारण केले नाही तर त्यांना तेल्या तांबोळ्यांचेही पुढारी समजले जात असेयामुळे टिळकांना बहुजनांचा पाठींबा मिळाला आणि ते राष्ट्रीय स्तरावर पोहाचलेपरंतु ते परंपरावादी होतेत्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व दबले गेलेआगारकरांचा सुधारणावादही ठराविक जातीधर्मापुरता नव्हतात्यांनी बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार केलाअण्णा भाऊ साठे हे विश्वात्मक आहेतत्यांनी सर्व तऱ्हेच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केलाशोषणाचासाम्राज्यवादाचा विरोध केलामहापुरुष कोणा एका जातीचेदेशाचे नसतात तर ते मानवतेचे उद्धारक असतात.

डॉअभय टिळक म्हणालेटिळक आगरकर यांच्या विचारांमधील समानसूत्र मुक्तीचे आहेविस्तारवादी साम्राज्यशाहीला टिळक यांचा विरोध होताटिळकआगरकर आणि अण्णा भाऊ या तिघांच्या संपूर्ण विचारविश्वाचा केंद्रबिंदू म्हणजे स्वायत्तजबाबदार माणूस घडताना सर्व प्रकारची मुक्ती हा आहे.

डॉश्यामा घोणसे म्हणाल्याटिळकआगरकर यांचे विचार हा पुरोगामी महाराष्ट्राचा पाया आहेविचारकलहाला भिऊ नकाहे मत आगरकर यांनी मांडलेमतभेदविचारभेद असले तरी चालतील पण मनभेद झाल्यास राष्ट्रीयत्वाला धोका निर्माण होतोअशी आगरकर यांची भावना होतीआधी केले मग सांगितले असे टिळकआगरकर आणि अण्णा भाऊ यांचे विचार होते.

रवींद्र गोळे म्हणालेसमाजातील एकत्वाची भावना अण्णा भाऊंच्या साहित्यात दिसतेत्यांनी आपल्या साहित्यात स्त्रीचे शीलपुरुषाचा स्वाभीमान आणि राष्ट्राचे स्वातंत्र्य या विषयी कधीही तडजोड केली नाहीसमाजाला जोडणारे विचार हा त्यांच्या लिखाणाचा आत्मा होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉधनंजय भिसे यांनी केलेस्वागत संपत जाधव यांनी तर आभार डॉआंबादास सकट यांनी मानले.

Leave a Reply

%d