fbpx
Tuesday, October 3, 2023
Latest NewsPUNE

विनोदबुद्धी राहिली नसल्याने सध्या व्यंगात्मक विनोदच शक्य – श्रावण हर्डीकर यांचे प्रतिपादन

पुणे : विनोद करण्याचे सध्या युग राहिलेले नाहीविनोद शेवटची घटका मोजत आहे असेही बोलले जात आहेया परिस्थितीला सर्वच घटक जबाबदार आहेतविनोदाचा आनंद घेण्याआधी तो पचविण्याची क्षमता समाजामध्ये निर्माण व्हावी लागतेविनोदवृत्ती राजकीय होते त्यावेळी राजकीय दृष्टीकोनातून दबाव यायला सुरुवात होतेस्वत:कडे विनोदबुद्धीने पाहण्याची क्षमता शिल्लक राहिलेली नसल्याने सध्या केवळ व्यंगात्मक विनोद करणेच शक्य आहेअशी वास्तव परिस्थिती नागपूर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (भाप्रसेयांनी परखड शब्दात मांडली.

डॉरवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी लिखित ‌‘फुकटचेच सल्ले‘ या पुस्तकाचे प्रकाशन हर्डीकर यांच्या हस्ते आज (दि. 26) झालेत्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होतेमहाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रामिलिंद जोशीसमीक्षक प्रारणधीर शिंदेमनोविकास प्रकाशनचे संचालक अरविंद पाटकर व्यासपीठावर होतेकार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

हर्डीकर पुढे म्हणालेविनोद हा कोणा एकावर नसून तो आपल्यातील आत्मवृत्तीवर असतोविनोदवृत्ती प्रत्येकामध्ये दडलेली असतेखुमासदार विनोदशैली आपल्याला जर जपायची असेल तर आपल्यासारख्या वाचकाला आत्मावलोकन करीत विनोद स्वीकारणे तसेच वृत्तीत खुलेपणा आणणे फार आवश्यक आहेडॉतांबोळी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक आनंददायी क्षण अनुभवायला मिळत असल्याचे हर्डीकर यांनी आवर्जून नमूद केले.

प्रामिलिंद जोशी म्हणालेविनोद या प्रकाराकडे कधी गांभीर्याने  बघितल्याने त्याची अपरिमित हानी झाली आहेअर्थधर्मकामशास्त्रावर स्वतंत्र ग्रंथ आहेत पण हास्यशास्त्रावरचा एकही ग्रंथ आपल्याकडे नाहीनदीसारखा विनोदाचा प्रवाह आपल्याकडे नाहीआपल्याकडे शांतरस आहेकरूणवीररस आहेपण हास्यरसाचा मात्र अभाव दिसतोमराठीतील विनोद आज अतिदक्षता विभागात आहे ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागणार आहेआजचा काळ विनोदी लेखनासाठी पूरक आहेगेल्या शंभर वर्षांत जेवढी स्थित्यंतरे झाली नाहीत तेवढी गेल्या दहा वर्षांत झाली आहेतजगणे आपल्यावर कोसळत आहेअशा परिस्थितीमध्ये विनोदी लेखनासाठी खूप मोठी संधी आहेपण समाजाची एकूण मानसिकता बघता विनोदबुद्धी क्षीण होणे आणि हास्य लोपणे हे समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचे लक्षण मानावे लागेलआभासी जगात श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची चढाओढ लागलेली असताना डॉतांबोळी यांनी विविध कथांची मांडणी उत्तम प्रकारे केली असल्याचे प्राजोशी यांनी नमूद केले.

प्रारणधीर शिंदे म्हणालेविनोद या साहित्य प्रकाराकडे मूल्यांच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहेमात्र विनोदाकडे विडंबन या दृष्टीकोनातून पाहिले गेलेतांबोळी यांनी आपल्या लिखाणातून समाजातील अनेक बारकावे मांडले आहेततांबोळी यांच्या पुस्तकातील विविध कथांचा आधार घेऊन त्यांच्या नर्मविनोदी लेखन शैलीवर मार्मिक भाषेत प्राशिंदे यांनी टिप्पणी केली.

सुरुवातीस डॉतांबोळी यांनी गोतावळ्यातून लेखन प्रवास कसा झाला हे सांगितलेप्रास्ताविक अरविंद पाटकर यांनी केलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांनी केलेमान्यवरांचे स्वागत अरविंद पाटकर आणि भूषण कदम यांनी केलेचित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांचा सत्कार प्रामिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आलापुस्तकातील ‌‘वाढलेल्या पोटाची काळजी‘ या लेखातील काही भागाचे वाचन पत्रकार विशाल परदेशी यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: