Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

व्यंगचित्रांतून बोचऱ्या गोष्टी मार्मिक पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवता येतात – सुषमा अंधारे

पुणे :  व्यंगचित्र हे समाजप्रबोधनाचे सर्वांत महत्त्वाचे माध्यम आहे. एका व्यंगचित्रामध्ये खूप मोठा आशय लपलेला असतो. व्यंगचित्रांच्या माध्यमातून दुखऱ्या, बोचऱ्या गोष्टी हसतखेळत मार्मिक पद्धतीने अगदी सहजतेने समाजापर्यंत पोहोचवता येतात, असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.

जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘बाळकडू’ या व्यंगचित्र स्पर्धेचे बक्षीस वितरण अंधारे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या स्पर्धेचे आयोजन शिवसेना पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत, अमित पापळ यांनी केले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी गटनेते अशोक हरणावळ, उपशहरप्रमुख बाळा ओसवाल, प्रशांत राणे सचिव मकरंद पेटकर, शहर संघटक राजेंद्र शिंदे, प्रसाद चावरे, गणेश वायाळ, नंदू येवले, नितीन रावळ, संजय साळवी, मनीष घरत,राजेश शेलार, दिनेश पोटे, गणपत साळुंखे, दिलीप पोमन, प्रकाश चव्हाण, व्यंगचित्रकार मुकीम तांबोळी, धनराज गरड, अमित पापळ आदी यावेळी उपस्थित होते.

अंधारे म्हणाल्या, शिवसेनाप्रमुखांनी व्यंगचित्रांतून समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली. व्यंगचित्रांतून ठाम पद्धतीने मांडणी करण्यासाठीदेखील धाडस लागते. ते धाडस शिवसेनाप्रमुखांमध्ये होते. कमी शब्दांमध्ये व्यक्त होण्यासाठी व्यंगचित्र हे सर्वात प्रभावी माध्यम आहे.

या स्पर्धेत युवा गटामध्ये (१८ वर्षांखालील गट) प्रथम क्रमांक यश गायकवाड, द्वितीय क्रमांक निमिश सामंत, तृतीय क्रमांक मनोमय नार्वेकर यांनी पटकावला, तर उत्तेजनार्थ पारितोषिक आभास शिळीमकर, शेराता क्षत्रिय, जीजा पापळ यांना प्रदान करण्यात आली. खुल्या गटामध्ये विजय नांगरे यांनी प्रथम, सुनील नेटके यांनी द्वितीय, श्रीपाद पालकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला, तर वासुदेव बोंदरे, तोफिक बागवान, मुकीम तांबोळी, गौतम धिवार, शरद महाजन यांना उत्तेजनार्थ पारितोषक देण्यात आले.

संजय मोरे म्हणाले बाळकडू व्यंगचित्र स्पर्धा म्हणजे सामान्य माणसाला लढण्यासाठी आवाज व्यक्त करण्यासाठी मिळालेला भालाच आहे, चुकीचे काम करणाऱ्याला जागे करण्याचे हे एक माध्यम आहे.

आयोजकांनी बाळकडू व्यंगचित्र स्पर्धा ही स्पर्धा म्हणजे एक मशाल असून ती सतत पेटत ठेवण्याचा निर्धार केला असे मत व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading