लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचे नाही – मुख्यमंत्री
मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट झाला असून कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून पुन्हा लॉकडाऊन केली जाण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र आज राज्य सरकार कडून लॉकडाऊन न करता कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमीका ट्विट करून स्पष्ट केली आहे.
यामध्ये मुख्यमंत्री म्हणतात, आपल्याला राज्यात कोठेही लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचे नाही. केवळ कायदे व नियम करून अशा परिस्थितीचा मुकाबला करता येणार नाही. यासाठी कोरोना नियमांचे व निर्बंधाचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका, असे म्हणत अप्रत्यक्षरीत्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.
आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचे नाही. केवळ कायदे आणि नियम करून अशा आव्हानांचा मुकाबला होऊ शकणार नाही. कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे pic.twitter.com/Lx8NT6S1bG
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 8, 2022