कोरोना – इंडियन मेडिकल असोसिएशनची लसीकरण धोरणावर टीका, लॉकडाउनचा दिला सल्ला
नवी दिल्ली, दि. ९ – मागील काही दिवसांपासून देशातील नवीन कोरोना रुग्णांची रुग्णांची संख्या दररोज ४ लाखांच्या आसपास आहे. कोरोनाच्या या भयानक परिस्थितीवर मात करण्यासाठी इंडिया मेडिकल असोसिएशनने ( IMA) लॉकडाउन करण्याची मागणी करत देशातील कोरोनाची परिसस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य मंत्रालय सुस्त झाले आहे, अशी टीका केली आहे. केवळ काही राज्यात लॉकडाऊन करुन चालणार नाही. देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याची मागणी करत केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर टीका केली आहे.
IMA ने म्हटले आहे की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता झोपेतून जागे व्हा, देशात आलेल्या कोरोनाच्या दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी काही महत्त्वाची पाऊले उचलणे गरजेचे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी ठोस पाऊले उचलत नाहीत, त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना संपूर्ण देशभर कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या बेजाबाबदारपणामुळे देशात भयानक कोरोनाची दुसरी लाट आली आहे,असाही आरोप करण्यात आला आहे.
#PMOIndia #NITIAayog #LargestVaccineDrive #IMAIndiaOrg IMA demands the health ministry wake up from its slumber and responds to mitigate the growing challenges of the pandemic. pic.twitter.com/7OxKgLhi9Q
— Indian Medical Association (@IMAIndiaOrg) May 8, 2021
कोरोनाची दुसरी लाट थोपण्यासाठी IMAने संपूर्ण देशात लॉकाडाऊन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र आरोग्य मंत्रालयाने हा प्रस्ताव फेटाळून लावला. IMAने लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, गेल्या २० दिवसांपासून देशात नियोजित पद्धतीने संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी केली जात आहे. मात्र केंद्रसरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही.
देशातील प्रत्येक राज्यात लॉकडाऊन लावून काहीही फायदा नाही. त्याचबरोबर नाईट कर्फ्यू लावूनही काही उपयोग नाही. जोपर्यंत राष्ट्रीय पातळीवर लॉकडाऊन केला जात नाही तोपर्यंत देशातील कोरोना कमी होणार नाही. केंद्राने आतापर्यंत लॉकडाऊन करण्याचा प्रस्ताव मान्य केला असता तर देशात बाधितांची संख्या ४ लाखांवर गेली नसती,असेही IMA ने म्हटले आहे.
