औरंगाबाद शहरात व्यवहार सुरू करण्यात वंचित आघाडीवर
औरंगाबाद,दि.१ – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडी करून प्रतिसाद दिला. औरंगाबाद शहरात या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद मध्ये आवाहन केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी व्यापाऱ्यांना व नागरिकांना सांगून सर्वसामान्य जीवन सुरू करण्याचे आवाहन केले. गोर गरिब जनता, फळवाले, भाजीवाले, टपरीवाले व हातावर पोट भरणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी काल ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद मध्ये येऊन पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी आवाहन केले होते की लोकांनी १ ऑगस्ट पासून आपला व्यवसाय सुरळीत सुरू करावा. तसेच ३ तारखेला रक्षाबंधन असल्यामुळे राखी विक्री सुरळीत व्हावी तसेच बहिणीला राखी बाधंण्यासाठी आपल्या माहेरी जाता यावे, त्यामुळे आजपासून शासनाचा कसलाच लॉकडाऊन पाळण्यात येणार नसल्याची शपथ यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यानी घेतली. वंचितचे औरंगाबाद शहर अध्यक्ष संदिप शिरसाठ यांनी लोकांना सर्वसामान्य जीवन जगण्यास सुरवात करावी म्हणून आवाहन केले. या वेळी दत्ता सुत्रावे,धनंजय भावले,नितीन साळवे,स्वप्नील गायकवाड,गुड्डु वाहुळ, राऊत,किरण गंगावणे,विशाल सोनवणे,स्वप्नील पाटील व व्यापारी मंडळी उपस्थित होते.