Monday, May 25, 2026
BusinessLatest News

टाटा एआयएने मोमेंटम ५० इंडेक्स फंड केला लाँच 

मुंबई: उल्लेखनीय आर्थिक वाढीसह, भारत जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांसाठी सर्वात आकर्षक बाजारपेठांपैकी एक म्हणून उदयास येत आहे. तरुण आणि गतिमान लोकसंख्या, जलद शहरीकरण आणि उत्कर्ष साधत असलेल्या मध्यमवर्गासह, देश विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण संधींच्या उंबरठ्यावर उभा आहे. या वृद्धी क्षमतेचा फायदा घेण्यासाठी, भारतातील एक आघाडीची जीवन विमा कंपनी, टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (टाटा एआयए) ने टाटा एआयए मोमेंटम ५० इंडेक्स फंड लाँच केला आहे. ही  एक स्मार्ट, संधींवर आधारित गुंतवणूक आहे. हा फंड तुम्हाला दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

हा अनोखा फंड भारतातील उच्च वाढीच्या प्रदेशांमध्ये इक्विटीमध्ये गुंतवणुकीची शक्ती आणि जीवन विमा संरक्षणाची सुरक्षितता यांना एकत्र आणतो. हा फंड सुनिश्चित करतो की तुमची गुंतवणूक वाढत राहील आणि तुमच्या प्रियजनांचे संरक्षण होत राहील.

नवीन फंड ऑफर (एनएफओ) १८ ऑगस्ट २०२५ रोजी गुंतवणुकीसाठी खुली होईल आणि २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत खुली राहील. एनएफओ कालावधीत प्रति युनिट किंमत १० रुपये असेल.

टाटा एआयए मोमेंटम ५० इंडेक्स फंड का निवडायचा?

१.  भारताच्या उज्ज्वल भविष्याचा लाभ मिळवा

येत्या काही दशकांत भारतीय अर्थव्यवस्था अनेक पटीने वाढेल असे अनुमान आहे, त्यामुळे कंपन्यांचा विस्तार वेगाने होईल, त्यांचे उत्पन्न वाढेल आणि मूल्य स्थिरपणे वाढेल अशी अपेक्षा आहे. या फंडाचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांना या संधींचा फायदा घेण्यास मदत करणे आहे.

२.  मोमेंटमवर आधारित गुंतवणूक धोरण

बीएसई ५०० मोमेंटम ५० कस्टमाइज्ड इंडेक्समधून निवडलेल्या भारतातील ५० टॉप-परफॉर्मिंग स्टॉकच्या गतीचा फायदा घेण्यासाठी हा फंड डिझाइन केला आहे. या धोरणासह, तुमची गुंतवणूक भारताच्या आर्थिक तेजीला चालना देणाऱ्या उच्च-वृद्धी करणाऱ्या कंपन्यांवर केंद्रित असेल.

३.  दीर्घकालीन संपत्ती निर्मिती

गतिशील आघाडीच्या कंपन्यांचा मागोवा घेऊन, हा फंड विविध क्षेत्रांमध्ये विविधता राखून दीर्घकालीन स्पर्धात्मक परतावा देण्याचा प्रयत्न करतो. हे अशा व्यक्तींसाठी डिझाइन केले आहे ज्यांना कालांतराने त्यांची संपत्ती सातत्याने वाढवायची आहे.

४.  अतिरिक्त जीवन विमा संरक्षण

गुंतवणूकदारांना जीवन विम्याचा अतिरिक्त फायदा मिळतो, ज्यामुळे कोणतेही संकट जरी उद्भवले तरी त्यांच्या प्रियजनांची  आर्थिक सुरक्षितता अबाधित राहते.

टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी हर्षद पाटील म्हणाले, “भारताचे इक्विटी बाजार एका रोमांचक टप्प्यात प्रवेश करत आहेत, त्यांचा हा प्रवास मजबूत आर्थिक मूलभूत तत्त्वे आणि परिवर्तनकारी धोरणात्मक उपक्रमांच्या आधारे चालतो. टाटा एआयए मोमेंटम ५० इंडेक्स फंड या वाढीचा फायदा घेण्यासाठी चांगल्या स्थितीत असलेल्या गतिमान कंपन्यांना ओळखण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी एक शिस्तबद्ध, नियम आधारित दृष्टिकोन प्रदान करतो. आमच्या पॉलिसीधारकांना इक्विटी बाजारांच्या संपत्ती निर्माण करण्याच्या क्षमतेत सहभागी होता यावे आणि त्यांच्या कुटुंबांसाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा फंड डिझाइन केला आहे.”

 

फंडाची प्रमुख माहिती

  • गुंतवणुकीचे उद्दिष्ट: उच्च गतीमान स्टॉक्समध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवल वाढ
  • बेंचमार्क: बीएसई ५०० मोमेंटम ५० कस्टमाइज्ड इंडेक्स
  • मालमत्ता वाटप: इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये १००%-८०%, रोख आणि मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये ०%-२०%

मोमेंटम इन्वेस्टींग धोरण म्हणजे काय?

सक्रियपणे व्यवस्थापित फंड मूलभूत संशोधनावर आधारित गुंतवणूक करतात. पण मोमेंटम गुंतवणूक ही स्टॉकमधील तांत्रिक किंवा किंमतीतील बदलांवर आधारित आहे.

हे धोरण अशा शेयर्सच्या खरेदीवर आधारित आहे ज्यांनी अलीकडे चांगली कामगिरी केली आहे आणि पुढे देखील चांगली कामगिरी करत राहण्याची शक्यता आहे. ही मजबुतीने खरेदी करण्याची, ट्रेंडचा फायदा घेण्याची आणि ट्रेंड उलट झाल्यावरच बाहेर पडण्याची रणनीती आहे.

ग्राहक काय अपेक्षा करू शकतात?

ग्राहक टॉप ५०० मधून ५० मोमेंटम जनरेटर स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची अपेक्षा करू शकतात, ज्यामुळे शाश्वत कामगिरीचा ट्रेंड असलेल्या कंपन्यांकडून फायदा मिळवण्याची क्षमता मिळते. हा फंड धोरणात्मक विविधीकरण देखील देतो, उच्च गतीमान संधींवर लक्ष केंद्रित करून विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतो. दीर्घकालीन गुंतवणूक क्षितिजासाठी डिझाइन केलेले, हे फंड पारंपारिक इंडेक्स फंडांच्या तुलनेत उच्च परतावा मिळविण्याची क्षमता देतात, गुंतवणूकदारांना जीवन विमा कव्हरद्वारे त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करताना संपत्ती कमविण्यास मदत करतात.

हा फंड टाटा एआयए स्मार्ट फॉर्च्यून प्लस, टाटा एआयए संपूर्ण रक्षा फ्लेक्स, टाटा एआयए स्मार्ट एसआयपी, टाटा एआयए कॅपिटल गॅरंटी सोल्यूशन आणि टाटा एआयए आयएसआयपीसारख्या टाटा एआयए सोल्यूशन्ससह उपलब्ध असेल.

टाटा एआयए फंड्सची सिद्ध कामगिरी

टाटा एआयए फंड्सनी दीर्घकाळात सातत्याने मजबूत परतावा दिला आहे, ज्यामुळे वाढ, स्थिरता आणि संरक्षण शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ते पसंतीचे पर्याय बनले आहेत. तज्ञ निधी व्यवस्थापन आणि शिस्तबद्ध गुंतवणूक धोरणाच्या पाठिंब्याने, टाटा एआयए फंड्सने पॉलिसीधारकांसाठी जास्तीत जास्त संपत्ती निर्मिती करताना मार्केट सायकल यशस्वीरित्या नेव्हिगेट केले आहे.

मजबूत कामगिरीचा हा ट्रॅक रेकॉर्ड भारताच्या विकसित होत असलेल्या आर्थिक परिदृश्यानुसार तयार केलेल्या गुंतवणूक उपाय प्रदान करण्याच्या टाटा एआयएच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो, गुंतवणूकदार आत्मविश्वासाने उदयोन्मुख संधींचा फायदा घेऊ शकतील याची खात्री करतो.

मागील पाच वर्षांमधील परतावे* (सीएजीआर)            
टाटा एआयए फंड्स फंड परतावा (%) * बेंचमार्क परतावा (%) *
मल्टी कॅप फंड 28.27% 19.31%
टॉप २०० फंड 29.07% 19.31%
इंडिया कन्जम्पशन फंड 27.79% 19.31%

*३१ जुलै २०२५ पर्यंतचा डेटा. मागील कामगिरी भविष्यातील कामगिरीचे सूचक नाही.

फंड बेंचमार्क: मल्टी कॅप फंड – बीएसई २००; इंडिया कन्झम्पशन फंड – एस अँड पी बीएसई २००; टॉप २०० फंड – एस अँड पी बीएसई २००. एसएफआयएनएन: मल्टी कॅप फंड – यूएलआयएफ ०६० १५/०७/१४ एमसीएफ ११०; टॉप २०० फंड – यूएलआयएफ ०२७ १२/०१/०९ आयटीटी ११०; इंडिया कन्झम्पशन फंड – यूएलआयएफ ०६१ १५/०७/११४ आयसीएफ ११०.

लाँचची तारीख: टॉप २०० फंड: १२ जानेवारी २००९, मल्टी कॅप फंड: ०५ ऑक्टोबर २०१५, इंडिया कन्झम्पशन फंड: ०५ ऑक्टोबर २०१५. या सोल्यूशनसाठी इतर फंड देखील उपलब्ध आहेत.

मोमेंटम ५० इंडेक्स फंड लाँच करून, टाटा एआयए आपल्या ग्राहकांना ‘ऑल द टाइम रेडी’ बनवण्याचे – आत्मविश्वास आणि आर्थिक सुरक्षिततेसह जीवनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी नेहमीच तयार राहण्याचे ध्येय पुढे चालू ठेवत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading