Sunday, June 7, 2026
BLOGLatest News

अमेरिकेचा भारतासह शेजारी राष्ट्रांच्या जमिनी हडप करून नवा देश निर्माण करण्यासाठी खटाटोप

मागील काही दशकांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील परस्पर संबंध सातत्याने वृद्धिंगत होत आहेत. मात्र, अमेरिका हा तद्दन स्वार्थी आणि अप्पलपोटा देश आहे. दुनियेचे वाटोळे झाले तरी चालेल, आपल्या तुंबड्या भरल्या पाहिजेत हेच अमेरिकेचे धोरण आहे. अमेरिका कधीही कोणाचा विश्वासू मित्र आणि सहकारी होऊ शकत नाही. अमेरिकेची भारत अशी मैत्री आणि धोरणात्मक सहकार्य हे निव्वळ नाटक आहे. एकीकडे भारताला जवळचा सहकारी म्हणायचे आणि दुसरीकडे भारतासह शेजारी राष्ट्रांच्या जमिनी हडप करून त्या ठिकाणी नवा देश निर्माण करण्यासाठी खटाटोप करायचा असे अमेरिकेचे उद्योग आहेत. 

भारत ही जगातील मोठी बाजारपेठ आहे. तरुण लोकसंख्या हे भारताचे बलस्थान आहे. आधुनिक तंत्रज्ञ आणि नव्या काळातील कौशल्य अवगत असलेले कुशल मनुष्यबळ भारताकडे उपलब्ध आहे. भारत ही जगातली उभरती अर्थव्यवस्था आहे. कोरोना काळानंतर संपूर्ण जगासाठी पर्यायी पुरवठा साखळी म्हणून भारत आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. भारताची लष्करी क्षमता जगातील बलशाली राष्ट्रांच्या तोडीस तोड आहे. चीनच्या विसरवाडी दादागिरीला टुरिस्टोर उत्तर देण्याचे सामर्थ्य भारताकडे आहे. या पार्श्वभूमीवर विश्वासघातकी पाकिस्तानची तळी उचलणे सोडून भारताशी मैत्री करणे अमेरिकेला क्रमप्राप्त आहे. मात्र, भारत आणि अमेरिकेची मैत्री स्वीकारली तरी भारत पूर्णतः अमेरिकेच्या कह्यातील मांडलिक देश होणार नाही, याचा सल अमेरिकेला आहे. त्यामुळे एकीकडे भारताशी मैत्रीचे नाटक करीत असताना दुसरीकडे भारताला खिळखिळे करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. 

रशियाच्या विभाजनानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपुष्टात आले आणि अमेरिका ही जगातील एकमेव महासत्ता बनली. मात्र, चीन हा देश अमेरिकेला आव्हान देऊ पाहत आहे. औद्योगिक उत्पादन क्षेत्रात आजही चीनचे निर्विवाद वर्चस्व आहे. सध्याच्या काळात उतरणीला लागली असली तरीही चीन ही जगावर प्रभाव पाडणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. लष्करी आणि आर्थिक सामर्थ्याच्या जोरावर इतर देशांमध्ये प्रभाव निर्माण करून त्यांना अंकित करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्यामुळे चीन हा अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाला आव्हान देणारा देश ठरला आहे. हे आव्हान मोडून काढून जगातील एकमेव महासत्ता हे आपले स्थान कायम ठेवण्यासाठी अमेरिका चीनवर उर्घोडी करण्याचा कोणताही मार्ग अवलंबण्यास सज्ज आहे. चीनवर लक्ष ठेवण्यासाठी आणि दबाव निर्माण करण्यासाठी चीनच्या आजूबाजूच्या देशात आपले तळ निर्माण करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. त्याला फारसे यश येत नसल्यामुळे भारत, बांगलादेश आणि म्यानमार कट्टर धार्मिकता आणि फुटीरतावादाला खतपाणी घालून या देशांचे काही भाग गिळंकृत करायचे आणि त्यांचे एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करून त्याला आपले मांडलिक बनवायचे, असे अमेरिकेचे धोरण आहे. 

जगातील प्रत्येक देशांमध्ये कितीही सामर्थ्य असले तरीही काही कच्चे दुवे शिल्लक राहतातच. जगातील इतर देश हे कच्चे दुव हेरून वेळ पडली तर त्या द्वारे त्या देशावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतत. अमेरिका हा महासत्ता असल्याने, आर्थिक, तंत्रज्ञान दृष्ट्या आणि लष्करी दृष्ट्या प्रबळ असल्याने तो देश या उद्योगात अग्रेसर आहे. म्यानमार या देशात कायम राजकीय अस्थैर्य राहिले आहे. लोकनियक्त सरकार आणि लष्कर यांच्यामध्ये या देशात कधीही परस्पर सामंजस्य निर्माण होऊ शकलेले नाही. देशात लोकनियुक्त सरकारची सत्ता असेल तर लष्कर ती उलथविण्याचा प्रयत्न करते. लष्कराची सत्ता प्रस्थापित असेल तर जनआंदोलनाच्या द्वारे राजकीय पक्ष तिला आव्हान देण्याचा प्रयत्न करीत असतात. लोकनियुक्त सरकारांपेक्षा लष्करी हुकूमशहांना हाताळणे अधिक सोपे असल्यामुळे अमेरिका म्यानमारमध्ये अधिकाधिक काळ लष्करी वर्चस्व राहील याच्या प्रयत्नात असते.

बांगलादेशला ही अंकित करण्याचा प्रयत्न अमेरिका वारंवार करीत आहे. मात्र बांगलादेशातील शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार अमेरिकेच्या प्रयत्नांना दाद लागू देत नाही. त्यामुळे अमेरिका बांगलादेशातील कच्चे दुवे हेरून त्या देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. एकतर चीनने बांगलादेश ला आर्थिक सहकार्य, शस्त्रास्त्रांचा पुरवठा, पाणबुडे आणि युद्ध लोकांचा पुरवठा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले आहे. या माध्यमातून बांगलादेशला आपल्या अंकित करून घेण्याचे चीनचेही प्रयत्न आहेत. मात्र, बांगलादेशमधील शेख हसीना सरकार ना अमेरिकेला डोक्यावर बसून घेत ना चीनला! त्यामुळे अमेरिका आणि चीन ही दोन्ही बलशाली राष्ट्र अमेरिकेत अस्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बांगलादेशात धरणे, बंदरे आणि विमानतळ यांच्या माध्यमातून आपले तळ निर्माण करण्याचा प्रयत्न चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून केला जात आहे. मात्र, बांगलादेश या दोन्ही बलाढ्य राष्ट्रांना दाद लागू देत नाही शेख हसीना सरकारचा कल भारताकडे अधिक आहे. ही देखील या दोन्ही देशांना सलावणारी बाब आहे. त्यामुळे चीन आणि अमेरिका हे दोन्ही देश बांगलादेशमधील सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न पोटतिडकिने करीत आहेत. 

ईशान्य भारतात विशेषतः मणिपूर मध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. या हिंसाच्या रामागे दिली जाणारी तात्कालीक आणि स्थानिक कारणे हे एक कथित असून या हिंसाचारामागे चीनबरोबरच अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संघटनेचा महत्त्वाचा वाटा आहे. अमेरिकेची सीआयए आणि इस्रायलची मोसाद या गुप्तचर संघटना ईशान्य भारतात मोठे कारस्थान करण्याच्या प्रयत्नात आहेत. ईशान्य भारतातील कुकी ही आदिवासी जमात मूलतः नैसर्गिक शक्तींचे पूजन करणारी जमात आहे. अमेरिकेने ख्रिश्चन धर्मगुरू पाठवून त्यांच्यात मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केले आहे. वस्तुत स्वातंत्र्यपूर्व इंग्रज राजवटी पासून हे धर्मांतरण आजचागायत चालू राहिल्याने ईशान्य भारतात ख्रिश्चन लोकसंख्येची वाढ झाली आहे. अमेरिकेने ख्रिश्चन धर्मगुरू पाठवून आदिवासींमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केला. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये फुटीरतावादाची ही पेरणी केली. या फुटीरता वादातूनच मणिपूरमध्ये हिंसाचार घडून आला. भारताला मित्र आणि धोरणात्मक सहकारी म्हणविणाऱ्या अमेरिकेने चीन बरोबर या हिंसाचाराला खतपाणी घातले. 

मुस्लिम धर्मातील रोहिंग्या हा समाज घटक सध्या म्यानमार, बांगलादेश आणि भारत यांच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. म्यानमार मधील हे आदिवासी लोक बांगलादेश आणि भारतात घुसले आहेत. त्यांची आक्रमकता आणि फुटीरतावादी प्रवृत्ती ही या सर्व देशांच्या मागची डोकेदुखी ठरली आहे. बांगलादेश ने त्यांना हाकलून पाठविण्याचे धोरण अवलंबल्या. त्यामुळे ते भारतात घुसले असून स्थानिक राजकारणाच्या समीकरणासाठी त्यांना देशात सामावून घेतले जात आहे. 

एकीकडे अमेरिका कुकी जमातीला येहुदी ठरवण्याच्या प्रयत्नात आहे. कुकी नेतृत्वाने इजरायलकडे आपल्याला येऊ दे म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे. अर्थातच यामागे मोसाद असल्यामुळे त्याला पाठिंबा मिळाला आहे. दुसरीकडे जिथे जातील तिथे फुटीरता वाद निर्माण करणाऱ्या रोहिंग्या जमातीला ओसद सीबीआयच्या मार्फत कुकी जमातीला आपण येहुदी असल्याचे धडे गिरविले जात आहे. त्याचप्रमाणे रोहिंग्यांना या तथाकथित येहुदींचे भाऊबंद असल्याची भावना सीआयए आणि मासर यांच्याकडून निर्माण केली जात आहे. 

या पद्धतीने अमेरिका भारताचा कुकीबहुल मणिपूर आणि ईशान्य भारतातील इतर भाग, म्यानमार आणि भारत यांच्या सीमेवरील आदिवासीबहुल भाग आणि बांगलादेश मधील रोहिंग्या सारख्या मुस्लिम बहुल भागांना एकत्रित करून या तीनही देशांचा भूभाग गिळंकृत करून ख्रिश्चन धर्माच्या आधारावर त्याला मुस्लिम समाजाची जोड देऊन एक स्वतंत्र राष्ट्र बनवू पाहत आहे. त्यासाठी अमेरिकेकडून ईशान्य महाराष्ट्रात ख्रिश्चन धर्मगुरूंना रसत पुरवली जात आहे. तथाकथित येहुदी आणि मुस्लिम यांच्यामध्ये बंधुभवाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न सीआयएच्या मार्फत केला जात आहे. भारत, म्यानमार आणि बांगलादेश यांच्यातील भूप्रदेश गिळकृत करून त्यामार्फत केवळ चीनच नव्हे तर जगातील नवी शक्ती म्हणून उभारण्यात येत असलेल्या भारतावर लक्ष भारत आणि अमेरिका यांच्यामधील मैत्री ठेवण्यात मदत मिळेल, असा अमेरिकेचा कयास आहे. त्याभारताने भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री हा केवळ राजनैतिक दिखावा असून भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीचा एकीकडे हवाला देत असताना अमेरिका भारत, म्यानमार आणि बांगलादेश यामधील भूभाग गिळंकृत करून त्या ठिकाणी नवीन अमेरिकेच्या वर्चस्वाखाली ख्रिश्चन राष्ट्र निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट होत आहे. 

या दृष्टिकोनातून पाहिले असता मणिपूरमध्ये घडत असलेला हिंसाचार ही स्थानिक आणि तात्काली प्रतिक्रिया नसून अमेरिका आणि चीन पुरस्कृत घटना असल्याचे उघड होत आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशमध्ये घडून येत असलेला हिंसाचार आणि बांगलादेश मध्ये घडून येत असलेला हिंसाच्या हा अमेरिका आणि चीन यांच्याच कटाचा एक भाग आहे हे उघड झाले आहे. ईशान्य भारतात मणिपूर मध्ये घडून आलेला हिंसाचार हा अमेरिकेचा डाव होता. बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन हा ही अमेरिकेचा डाव आहे. त्याला चीनकडूनही हवा दिली जात आहे. नजीकच्या भविष्यकाळात म्यानमार मध्येही यादवी सदृश परिस्थिती निर्माण करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असेल. अशावेळी भारताने ईशान्य भारताकडे अधिक लक्ष देणे आणि त्यांना मूळ प्रवाहात सामावून घेणे अधिक आवश्यक आहे. 

म्यानमार आणि बांगलादेशातून हाकलून दिलेले रोहिंगे आणि ईशान्य भारतातील कुकी ही आदिवासी जमा यांना एकत्र करून त्यांच्यात फुकीर्तावादाचा प्रसार करून भारत, म्यानमार आणि बांगलादेश यांच्यातील भूप्रदेश वेगळा काढून स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे आणि त्या राष्ट्रावर स्वतःचे प्रभुत्व निर्माण करून चीन बरोबरच बलाढ्य होत असलेल्या भारतावर लक्ष ठेवणे हा अमेरिकेचा डाव आहे.

सलग तिसऱ्या वेळी पंतप्रधानपद हस्तगत केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी रशियाला भेट दिली. ही भाव अर्थातच अमेरिकेला पचनी पडली नाही. अमेरिका जगाला एककेंद्रित अर्थात अमेरिकेच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अमेरिका इतर देशांच्या हितसंबंधांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या देशातील शस्त्रास्त्रांचा व्यापार वाढविण्यासाठी जगभर लढाया लढवत असल्याचे जगाच्या निदर्शनास आले आहे. ज्यावेळी भारत एक गरीब आणि कमजोर राष्ट्र असताना रशियाने त्यांची मैत्री निभावली आहे. भारत आणि रशिया यांच्यामधील मैत्री अमेरिकेला खूपच आहे. त्यामुळे अमेरिकेसारखा स्वार्थी देश भारताने रशियाशी मैत्री करू नये यासाठी दबाव आणत असतानाच चीनवर वर्चस्व गाजवण्यासाठी भारताला जवळ करत आहे. त्याचवेळी ईशान्य भारतात दुफळी माजवून एका स्वतंत्र ख्रिश्चन राज्याचा डाव टाकत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading