Sunday, June 14, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

मोदींच्या गॅरंटीमुळे ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला मोठा प्रतिसाद – खासदार प्रकाश जावडेकर

पुणे  : “लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. मोदी जे बोलतात ते करतात. मोदींची गॅरंटी ही गॅरंटी आहे. त्यामुळेच ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला देशभर मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.”

लोककल्याणकारी मोदी सरकारच्या योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व अंमलबजावणीसाठी विकसित भारत संकल्प यात्रा आज गोखलेनगर मध्ये पोहोचली. त्यावेळी जावडेकर बोलत होते. योगेश बाचल, आदित्य माळवे, राजश्री काळे, श्याम सातपुते, लक्ष्मण लोखंडे, सतीश बहिरट, विकास डाबी, संतोष काळे, लक्ष्मण नलावडे यांची उपस्थिती होती.

जावडेकर म्हणाले, “या अभियानाअंतर्गत 26 जानेवारी पर्यंत सर्व वस्त्यांवर व्हिडिओ रथ जाणार आहे. मोदी सरकारने पुढील पाच वर्षांसाठी गरीब अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. ज्या पात्र नागरिकांना या योजनेचा अजूनही लाभ मिळत नाही त्यांची या अभियानात नोंदणी केली जाणार आहे. तसेच आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे सभासदत्वही दिले जाणार आहे. सर्व जनकल्याणाची कामे या अभियानात होत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading