बी.एस.एन.एल.नॉन एक्झिक्युटिव्ह कर्मचाऱ्यांच्या मानवी साखळी आणि संयुक्त मोर्च
पुणे ” अभिनव चौक ते टेलीफोन भवन बाजीराव रोड या ठिकाणी बीएसएनएलमधील सर्व नॉन एक्सिक्यूटिव्ह कर्मचाऱ्यांचे संयुक्त मोर्चा च्या वतीने एक मानव साखळी चा आंदोलन आयोजित करण्यात आले होते! या मोर्चामध्ये मोठे संख्या मध्ये कर्मचारी सहभागी झाले! या वेळी कॉम नागेश कुमार नलावडे, युसुफ जकाती, विकास कदम, गणेश भोज, बबन सूर्यवंशी, शशांक नायर, रोहिणी कुलकर्णी, नफिस काजी, नरेंद्र माने, आनंद मुळविकर, उल्हास जावळेकर. सुधाकर खडके उपस्थित होते व त्यांनी सभेला मार्ग दर्शन केले.
आंदोलनाची मागणी
1) देशाचे नागरिकांना स्वस्त दरामध्ये आणि बीएसएनएल ला जिवंत ठेवण्यासाठी 4G/5G ताबडतोब सुरू केले पाहिजे,
2) BSNL मधील संध्या काम करता असलेले 95% कर्मचारी स्टॅग्नेशन मध्ये गेले आहे म्हणजे त्यांचा वार्षिक इंक्रीमेंट बंद झाला आहे. अधिकार परमाने नवीन प्रमोशन पॉलिसी लाघु कली पाहिजे त्यामुळे त्या सर्वांचा नुकसान थांबेल.
3) सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1/1/2016 पासुन सातवा पे आयोग मिळालेला आहे, आठवीची तयारी सुरू झालेली आहे पण बीएसएनएलचे कर्मचाऱ्यांना मात्र बीएसएनएल तोट्यात आहे या नावाखाली सातव्या पे आयोग पासून वंचित ठेवले गेले! हा फार मोठा अन्याय केंद्र सरकार बीएसएनएल कर्मचाऱ्यांवर मागील 6 वर्षा पासून करीत आहे! याच्या विरोधामध्ये संपूर्ण भारतभरात आज 28 तारखेला मानव साखळीचा आंदोलन आयोजन करण्यात आला!
