संजय राऊत 100 दिवस जेलमध्ये राहिले पण हुकूमशाहीला शरण गेले नाहीत -वरुण सरदेसाई
पुणे: पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्यायालायने जामीन मंजूर केल्यानंतर शिवसेनेच्या वतीने अख्या राज्यभर जल्लोष सुरू आहे. त्यावर वीविध नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.
संजय राऊत जेलच्या बाहेर आले आहेत. शंभर दिवसांनी बाहेर आले आहेत.100 दिवस जेलमध्ये राहिले पण हुकूमशाहिला सामोरे गेले नाहीत . अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
वरून सर देसाई म्हणाले, संजय राऊत साहेब यांची आज सुटका झाल्यामुळे शिवसेना अख्या राज्यभर जल्लोष करत आहे. संजय राऊत सारख्या खऱ्या शिवसैनिक असल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे असे वरून सर देसाई म्हणाले.
भाजपच्या जे विरोधी बोलतात त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करतात आज न्यायालयाने जे ईडीला पट कारले आहे. त्यामुळे लोक समजून गेले असतील. असे वरून सरदेसाई म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर जे आरोप केले आहेत. त्यांची या पत्राचार गैरव्यवहार प्रकरणात कुठलीही चूक नाही. तरी त्यांच्यावर कारवाई केली गेली असा आरोप वरून सर देसाई यांनी केला.
देसाई म्हणाले, राज्यात मध्यवर्ती निवडणुका होतील असे विरोधी पक्ष म्हणत त्यावर देसाई म्हणाले, तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तुम्ही लांब लांब पळू नका असे सर देसाई म्हणाले.
राज्यात 50 खोके चा विषय राज्यात चांगला तापला त्यावर वरून सरदेसाई म्हणाले, मी आणि आयत्या ठाकरे यांनी राज्यात पंधरा-वीस जिल्ह्यांचे दौरे शेतकरी सुद्धा म्हणत आहेत शिंदे गटातील आमदारांनी 50 खोके घेतले. असे सरदेसाई म्हणाले.