मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेमध्ये असे घडलेच नसते – संभाजी राजे
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून एकीकडे सत्ता बदलाचे वारे वाहू लागले असताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेमध्ये असं घडलं नसतं, असे वक्तव्य छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी आज विश्रांतवाडीमध्ये पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचं स्वागत केलं. यावेळी ते बोलत होते.
संभाजी राजे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून 35 पेक्षा जास्त शिवसैनिकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. पण जर मला उमेदवारी शिवसेनेने दिली असती तर आज शिवसेनेचे अशी अवस्था झाली नसती. एकनाथ शिंदे यांची खदखद ही आताची नसून पूर्वीपासूनच होती. त्याचा स्फोट फक्त आज झाला असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, जे चाललंय ते तुम्हीही बघत आहात मीही बघतोय, काय निर्णय येतो बघू. सरकार कुणाचेही असावे पण ते चांगलं चालावं आमचं एवढंच मत आहे, असंही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.