राष्ट्रवादी कॉँग्रेस सामाजिक न्याय विभाग तर्फे चिंतन शिबिर संपन्न
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने नुकतेच लोणावळा येथे चिंतन शिबिर पार पडले. शिबिरात महत्वपूर्ण ठराव करण्यात आले. या वेळी 100 पदाधिकारी उपस्थित होते .चिंतन शिबीरात गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या साथीमुळे काय ,काय परिणाम झाले व त्यातून कोणते प्रश्न निर्माण झाले.त्याच बरोबर संघटनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला .अशी माहिती माजी आमदार अॅड. जयदेव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पंडित कांबळे, विकी लोखंडे, विशाल लोखंडे,अरुण काळे,मयूर गायकवाड उपस्थित होते.
जयदेव गायकवाद म्हणाले, देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रातील सर्वात आघाडीचा पुरोगामी पक्ष आहे.
या पक्षाने 2011साली मागासवर्गीयांच्या हक्काची सावली निर्माण करुन मागासवर्गीयांच्या विकासाचे धोरण अधोरेखित केले आहे. मागासवर्गीयांचे शैक्षणिक आर्थिक शेती व सहकार उद्योगांचा विकास करण्याच्या दृष्टीने सुमारे 140 कमी धोरण आखले आहे त्यामध्ये हिंदू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय मार्गाचे बांधकाम चालू आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे काम अनेक जिल्ह्यात चालू आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेता यावे यासाठी दिली जात आहेत तसेच मागासवर्गीयांसाठी असणारे महामंडळ त्यांना निधी उपलब्ध करून दिली आहे.केली याचा विचार करता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मागासवर्गीयांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.
