fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विधिमंडळाचे अधिवेशन दोन दिवसांचे; विरोधक आक्रमक

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना संदर्भात मंगळवारी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत सरकारने दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन असावं असा प्रस्ताव बैठकीत सादर केला. यावरुन आक्रमक होत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना कोरोनाचा बहाणा पुढे करुन अधिवेशन टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचं पावसाळी अधिवेशन होऊ नये यासाठी कोरोनाचं कारण राज्य सरकार देत आहे. जेव्हा जेव्हा अधिवेशन जवळ येतं, तेव्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याच्या बातम्या समोर येतात. कोरोनाचा बहाना पुढे घेऊन राज्याचं अधिवेशनच घेऊ नये असा सरकारचा प्रयत्न आहे. केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा सरकारचा डाव आहे,

एकीकडे राज्यात हजारोंच्या संख्येने पक्ष कार्यालय उद्घाटन चालतं. मग अधिवेशन का नाही, असा प्रश्न करत विरोधी पक्षाने विधीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. या आघाडीकडून लोकशाहीची थट्टा सुरु असल्याने आम्ही बैठकीतून बाहेर पडलो, असं फडणवीसांनी सांगितलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading