निळू फुले यांच्या हाती घ्याल ते तडीस न्या या शिकवणीने दिली पुढे जाण्याची ऊर्जा – अमृता सुभाष
मला सतत आव्हाने स्वीकारायला आवडतात. आपण जेव्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत असतो तेव्हा शांत असतो. भविष्यकाळात आपल्याला भरपूर दिग्दर्शन करून कारकीर्द घडवायची आहे. जिथे शिकायला मिळते ते करायचे असल्याचे असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
काम करताना कंफर्ट झोन कुठेच नसावा काहीतरी पणाला लागलेले असेल तर तुमच्यातले उत्तम त्यावेळी बाहेर येते. आपण जे हार्ड वर्क करतो त्याला ग्लॅमर असले तरी रिलॅक्स होण्याला ते नाही. आपल्याला आराम हा देखील तितकाच महत्वाचा आहे. नाटक हे माझ्यासाठी औषध आहे. काही प्रयोगाच्या दरम्यान मला ताप आला तर नाटकाचा प्रयोग सुरु असताना तो उतरतो आणि नाटक संपल्यावर तो पुन्हा येतो. नाटक करताना मी कधीच दमत नसल्याचे त्या वेळी म्हणाल्या. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मध्ये गेल्यावर तुला नाटकात काम केलेली माणसे भेटतील, देशातल्या विविध भाषांमधील रंगभूमीवर काय सुरु आहे, हे समजेल असा सल्ला डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्याला दिलेला मोलाचा सल्ला कामी आल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियाने ट्रोल होण्याकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहायचे हे महत्वाचे असते. कलाकार कायम सॉफ्ट टार्गेट होतात. ट्रोल होताना आपण तटस्थ राहणे योग्य ठरते, असे अमृता सुभाष यांनी सांगितले. मुलाखतीच्या शेवटी त्यांनी ” रावी के उसपार चलना ” हे गाणे सादर केले.
निळू फुले यांनी आमच्या कामाचे केलेले कौतुक हे ऑस्कर पुरस्कारासमान असल्याचे मत अभिनेते प्रसाद ओक यांनी यावेळी व्यक्त केले.
आजच्या काळात समाजात असलेले आदर्श ओळखता येणे, रोल मॉडेल्स समाजाला सांगता येणे महत्वाचे आहे. सच्चेपणाने काम करणाऱ्या कलाकारांच्या पाठीवर थाप मारण्याचे काम करण्याची जबाबदारी असल्याचे मत समीर बेलवलकर यांनी प्रास्तविकामध्ये मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.
