Monday, June 22, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

तकलादू देशभक्तांच्या काळात बाबासाहेबांचेच विचार दिशादर्शक ठरतील -माजी आमदार मोहन जोशी

पुणे – द्वेषावर आधारित राजकारण करून मिरवणाऱ्या तकलादू देशभक्तांच्या काळात सध्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि संविधान देशाला योग्य दिशेला नेईल, असे प्रतिपादन माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. डॉ बाबासाहेब यांनी क्रांतीकारी आणि दूरदृष्टीचे विचार मांडले. त्यातूनच लोकशाहीला बळकटी आली, असे या कार्यक्रमात बोलताना मोहन जोशी यांनी सांगितले.

या प्रसंगी सुनिल मलके, प्रशांत सुरसे, सुरेश कांबळे, प्रथमेश अबनावे, चेतन आग्रवाल, स्वाती शिंदे, साजीद शेख, विकास माने, पंकज बनसोडे, विक्रांत दिवेकर, व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading