Monday, June 8, 2026
BusinessLatest News

जयपूर येथील सायलावास जेलमधील विहीर नूतनीकरण आणि पुनरुज्जीवन उपक्रमाचे उद्घाटन

जयपूर : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (FIL) आणि त्यांचे CSR भागीदार, मुकुल माधव फाउंडेशन (MMF), यांनी राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात असलेल्या विशेष मध्यवर्ती जेल, सायलावास येथील विहिरीच्या नूतनीकरण आणि पुनरुज्जीवन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. हा उपक्रम FIL-MMF च्या व्यापक सीएसआर प्रयत्नांचा एक भाग म्हणून शाश्वत जल व्यवस्थापन आणि समाज कल्याणाप्रती असलेली अतूट बांधिलकी दर्शवतो.

या उद्घाटन समारंभासाठी मोनिका अग्रवाल, पोलीस महानिरीक्षक, तुरुंग विभाग, राजस्थान, शौरभ स्वामी (एसपी जेल) आणि  राजेश दुकिया (जेलर), लवकुश गुर्जर (उद्योग प्रभारी, कारागृह) आदी मान्यवर उपस्थित होते.  चिराग पगधर, विक्री प्रमुख, पश्चिम विभाग, नितीन जैन, विक्री प्रमुख, आशिष शर्मा-जयपूर विक्री प्रमुख, पंकज खंडेलवाल, उन्नती सेल्स, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे किरकोळ विक्रेता, डोसा,  हेमंत चतुर्वेदी, आणि  नितुल बारोट, यांनी FIL आणि MMF चे प्रतिनिधीत्व केले.

नूतनीकरण केलेली ही विहीर अंदाजे 550 कैदी आणि कर्मचारी सदस्यांना कायमस्वरूपी पाणी मिळेल यासाठी राबवण्यात आलेला एक परिवर्तनकारी उपक्रम आहे. जीर्णोद्धारामुळे तुरुंगाच्या आवारात स्वच्छ पाण्याची उपलब्धता, पाण्याच्या नियमित उपलब्धतेमुळे राहणीमानात बदल, उत्तम स्वच्छता आणि एकूणच सर्वसमावेशक असे चांगले बदल होत आहेत. हरित पर्यावरणाला बढावा देऊन हा उपक्रम वृक्षारोपणाच्या प्रयत्नांना देखील पाठबळ देतो. तसेच याद्वारे बाह्यजलस्रोतांवरील यंत्रणेचे अवलंबित्व कमी होते. पूर्वी, महिन्याला जवळपास 1 लाख रु. खर्च करून हे कारागृह टँकरचे पाणी घेत होते. विहीर पुनरुज्जीवनामुळे केवळ या खर्चातच कपात झाली नाही तर यंत्रणेसाठी दीर्घकालीन स्वयंपूर्णता आणि साधनांचे संवर्धन देखील झाले.

या कार्यक्रमात भावना व्यक्त करताना सुश्री मोनिका जी यांनी अर्थपूर्ण योगदानाबद्दल फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अखंडित पाणीपुरवठ्यामुळे वनीकरण आणि सुशोभीकरणाच्या प्रयत्नांना सक्षम करताना दैनंदिन कामकाजात सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली. तसेच, त्यामुळे एक सकारात्मक, पुनर्वसनासाठी पोषक वातावरण तयार होईल, असे सांगत त्यांनी प्रकल्पाच्या शाश्वत प्रभावावर प्रकाश टाकला.

FIL-MMF च्या वतीने,   चिराग पगधर यांनी प्रकल्प अंमलबजावणीदरम्यान केलेल्या सहकार्य आणि आदरातिथ्याबद्दल तुरुंग अधिकाऱ्यांचे आभार मानले. प्रभावी CSR प्रकल्पांद्वारे सामाजिक विकास आणि टिकाऊपणामध्ये योगदान देण्याच्या संस्थेच्या ध्येयावर जोर दिला.

FIL-MMF आणि तुरुंग अधिकाऱ्यांनी परस्पर सहकार्याने केलेल्या प्रयत्नांची  शौरभ स्वामी, एसपी जेल यांनी प्रशंसा केली. यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला, असे सांगितले. त्यांच्या आभारप्रदर्शनाने समारंभाचा समारोप झाला.

हा प्रकल्प म्हणजे भारतातील तुरुंग व्यवस्थेतील जीवन बदलण्याच्या मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यापक मिशनचा एक भाग आहे. पुनर्वसन आणि कौशल्य-निर्मिती कार्यक्रम राबविण्यासाठी MMF ने देशभरातील तुरुंगांशी सहकार्य केले आहे. याचा उद्देश गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करणे आणि रोजगारक्षमता सुधारणे हा आहे. कैदी आणि तुरुंगातील कर्मचारी दोघांवरही या उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला आहे, त्यामुळे त्यांचा सन्मान आणि आत्मनिर्भरता वाढली आहे.

MMF च्या उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये खुल्या तुरुंगातील कृषी उपक्रम, महिला आणि मुलांसाठी आरोग्य शिबिरे, कैद्यांकडून चालवल्या जाणाऱ्या कॅन्टीनचे नूतनीकरण, महाराष्ट्रातील येरवडा कारागृहात संगणकाची तरतूद आणि वडोदरा कारागृहातील कैद्यांसाठी गुजरातमधील ITI च्या सहकार्याने प्लंबिंग प्रशिक्षण यांचा समावेश आहे. सर्वसमावेशक वाढ, दुसरी संधी आणि कैद्यांना त्यांच्या विकासासाठी पाठबळ देत समाजात यशस्वी ठरण्याच्या  संधी निर्माण करण्यावर FIL-MMF चा असलेला विश्वास हे प्रकल्प दर्शवतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading