आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीचे ॲसेट अंडर मॅनेजमेंट ३ लाख कोटींपुढे
मुंबई: आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीने ऐतिहासिक कामगिरी केली असून, ॲसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) ३ लाख कोटींपुढे नेत लक्षणीय टप्पा गाठला आहे. ३१ जुलै २०२४ रोजी कंपनीचे एयूएम ३.१४ लाख कोटींवर गेले आहे.
विशेष म्हणजे, सर्व व्यावसायिक विभागांत कंपनीने जून २०२४ पर्यंत ९.८४ कोटींचे जीवन विमा कवच पुरविले असून, हे प्रमाण जून २०२२ मधील ८.१९ कोटींच्या तुलनेत ५९ टक्क्यांनी वाढले आहे. एकूण अंमलात असलेले सम अश्युर्ड ३० जून २०२४ रोजी ३५.१० लाख कोटींवर गेले आहे.
ही कामगिरी ग्राहकांना त्यांची दीर्घकालीन आर्थिक ध्येय पूर्ण करण्याबद्दल, तसेच दाव्यांची प्रक्रिया सफाईदारपणे पूर्ण करत आर्थिक सुरक्षा पुरविण्याबद्दल कंपनीवर असलेला विश्वास दर्शविणारी आहे.
दावे हे कंपनीसाठी अंतिम सत्य असून, सर्व दावे संवेदनशीलपणे आणि वेगाने हाताळले जातात. ही बांधिलकी कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२४ मध्ये या क्षेत्रातील आघाडीच्या ९९ टक्के क्लेम सेटलमेंट गुणोत्तरात दिसून आली आहे. तपासणी न झालेल्या रिटेल डेथ क्लेम्ससाठी कंपनीचा प्रतिसाद देण्याचा वेळ फक्त १.२७ दिवस आहे.
जीवन विमा सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी, तसेच योग्य ग्राहकाला योग्य उत्पादन, योग्य किमतीत आणि योग्य माध्यमाद्वारे मिळवून देत, अनोखा ग्राहकानुभव देण्यासाठी कंपनी बांधिल आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनुप बागची म्हणाले, ॲसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) ३ लाख कोटींपुढे गेल्याचा लक्षणीय टप्पा पार केल्याचा आम्हाला आनंद होत आहे. विशेष म्हणजे, योग्य ग्राहकाला योग्य उत्पादन, योग्य किमतीत आणि योग्य माध्यमाद्वारे मिळवून देण्याच्या आमच्या धोरणामुळे विमा उतरविलेल्या ग्राहकांचे प्रमाण तब्बल ५९ टक्क्यांनी वाढले आहे. जून २०२२ मध्ये ६.१९ कोटी विमाधारक ग्राहकांचे प्रमाण जून २०२४ मध्ये ९.८४ कोटींवर गेले आहे. ही कामगिरी ग्राहकांना आमच्यावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.’
ग्राहक आमच्यावर त्यांच्यासाठी, तसेच त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा पुरविण्यासाठी अवलंबून असतात. म्हणूनच आम्ही ग्राहकाच्या बचतीचे विश्वस्त आणि संरक्षक म्हणून काम करतो. आम्ही अतिशय कडक गुंतवणूक तत्त्व आणि जोखीम व्यवस्थापन फ्रेमवर्क कंपनीमध्ये रुजविले आहे. त्यामुळे स्थापनेपासून, तसेच बाजारपेठेतील विविध चक्रांदरम्यान शून्य नॉन– परफॉमिंग ॲसेट्स कायम राखणे शक्य झाले आहे.
बागची पुढे म्हणाले, ‘जीवन विमा समाजाच्या आर्थिक सुरक्षा, संपत्ती निर्मिती आणि निवृत्तीसाठीचे उत्पन्न अशा प्रमुख गरजा पूर्ण करतो. म्हणूनच आम्ही आमची उत्पादने आणि प्रक्रिया त्याच्याशी सुसंगत पद्धतीने तयार केल्या आहेत. अंमलात आणलेल्या तंत्रज्ञानामुळे आम्हाला जीवन विमा सुलभ करणे, नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करणे व ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे शक्य होते.’
दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची आमची बांधिलकी आर्थिक वर्ष २०२४ मध्ये या क्षेत्रातील आघाडीच्या ९९ टक्के क्लेम सेटलमेंट गुणोत्तरात दिसून आली असून, आमचा प्रतिसाद कालावधी केवळ १.२७ दिवस आहे.
