Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

women’s day : महिलांनी स्वाभिमान बाळगला पाहिजेच – गीतांजली विक्रम किर्लोस्कर याचे मत

महिला सशक्तीकरण हे आतून यायला हवे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वाभिमान बाळगा. भारतीय महिला बोर्डरूमपासून ते क्लासरूमपर्यंत, गजबजलेल्या रस्त्यांपासून दुर्गम गावांपर्यंत ताकदीने आणि दृढ निश्चयाने वावरत आहेत. त्या घर, कुटुंब, काम आणि आपले करियर यामध्ये ती सुंदरपणे समतोल साधते.त्या बंड करत नाहीत किंवा भांडण नाहीत. त्या तोडगा काढतात. त्या मार्ग काढतात. त्या कठोर कष्ट करतात आणि जिंकतात सुद्धा .

जागतिक महिला दिनानिमित्ताने किर्लोस्कर सिस्टिम्स प्रा. लि.च्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका गीतांजली विक्रम किर्लोस्कर म्हणाल्या की प्रत्येक महिलांनी समाजात ताठ मानेने राहिले पाहिजे, गरज पडेल तेथे व्यक्त झाले पाहिजे. आपले मूल्य ओळखा. तू सुंदर आहेस, तू हे सर्व एकत्र बांधतेस. प्रत्येक सकाळी जेव्हा सूर्य उगवेल, तेव्हा तो महिलांची शक्ती आणि संवेदनशीलता यांना दाद देईल.आपण या जगात आणत असलेल्या शक्तीचा आदर करा. एक महिला या जगात आणत असलेल्या प्रेम आणि संतुलनासाठी.

महिला दिनाच्या शुभेच्छा. प्रत्येक दिवस विशेष असू द्या कारण ते आम्हाला आमची स्वप्ने साकार करण्यास मदत करते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading