पवारांच्या घोषणे नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांना अश्रु अनावर
मुंबई : ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या प्रकाशनावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली अन् सभागृहात एकाच गदारोळ माजला. कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना निर्णय मागे घेण्यास सांगितले. पण पवार हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अनेकदा विनवणी करून देखील शरद पवार यांनी भाष्य न केल्याने कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले. पक्षातील वरिष्ठ नेते व राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आदि भावूक झाले होते.
यावेळी जयंत पाटील यांना बोलताना अश्रु अनावर झाले. ते म्हणाले, शरद पवार साहेब यांना निवृत्त होण्याचा अधिकारच नाही. देशपातळीवर पक्षाची ओळख ही शरद पवार यांच्या नावाने आहे. देशाच्या राजकारणात पवार यांच्या नावाला वेगळे महत्व आहे. तुम्ही निवृत्त झाले तर पक्षाच काय होईल. तुम्ही आमच्या सगळ्यांचे राजीनामे घ्या पण तुम्ही निवृत्त व्हायच नाही.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, फक्त राष्ट्रवादी पक्षच नाही तर राज्याला आणि देशाला साहेब तुमची गरज आहे. तुमच्यामुळे आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते. आमच्या संगळ्यांपेक्षा जास्त काम तुम्ही या वयात करता.
राजेश टोपे म्हणाले, ज्याप्रमाणे करूणानिधी शेवट पर्यंत द्रुकमचे अध्यक्ष होते. त्याप्रमाणे तुम्हीच राष्ट्रवादीची अध्यक्ष राहिले पाहिजे. तुमच्या नावात पक्ष टिकवून ठेवायची शक्ती आहे.
दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, विद्या चव्हाण, प्रफुल पटेल यांनी ही शरद पवार यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली.