Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

इतरांच्या सुखामध्ये सुख पाहणे हेच माणूसपण : प्रा.डॉ. स्वानंद पुंड

पुणे : माणसाचे जीवन हे अलौलिक आहेमाणूस म्हणजे नेमके काय हे चिंतन करावे लागणे हे माणूसपणातील वेगळेपण आहेइतरांच्या सुखामध्ये सुख पाहणेइतरांना आनंद देणे याला माणूस होणे म्हणतातदु:खदायक वाटणाऱ्या गोष्टीतूनही आनंद घेता आला तर मोठे झालो असे समजण्यास हरकत नाहीसाहित्यसंगीत आणि कला याचा जीवनात समावेश असणे हे माणसाचे वेगळेपण आहेअसे प्रतिपादन ज्येष्ठ गाणपत्य (गणेश उपासकआणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख प्रा.डॉस्वानंद पुंड यांनी केले.

नामवंत वक्त्यांचा सहभाग आणि सामाजिकसांस्कृतिकधार्मिक तसेच आरोग्य अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील सहजीवन व्याख्यानमालेस आज ‘माणूस तुझे नाव‘ या विषयावरील पुंड ंयांच्या व्याख्यानाने व्याख्यानमालेची सुरुवात झालीव्याख्यानमालेचे यंदाचे 21वे वर्ष आहेप्रतिवर्षाप्रमाणे व्याख्यानमालेस पहिल्या दिवसापासून श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळालापुंड यांच्यासह डॉराम साठेउदय कुलकर्णीराजेंद्र देव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.

पुंड म्हणालेनिसर्गापेक्षा मोठा गुरू नाही आणि निरिक्षणापेक्षा मोठे शास्त्र नाहीमाणसाच्या पोटाच्या वरील स्तरावर मन असते तर मनाच्या वरच्या स्तरावर बुद्धी असते हे माणसातील वेगळेपण आहेपशु आणि मानव यांच्यातील भेद विषद करून ते पुढे म्हणालेपशुपक्षांचे पोट आणि डोके एकाच पातळीवर असल्याने ते पोटापलिकडे जाऊन विचार करू शकत नाहीतपरंतु माणसाकडे बुद्धीमन आणि हसण्याची कला असणे हे वेगळेपण आहेकोणाचेही जीवन परिपूर्ण नसतेहसणे परिस्थितीवर अवलंबून नसतेपशु सुद्धा आहारनिद्राभयमैथुन करू शकतातपशुंना रडता येते पण माणसाला हसता येणे तसेच त्याच्या आयुष्यात काव्यशास्त्रविनोदसाहित्य संगीतकला असणे हे त्याचे वेगळेपण आहे.

अध्यात्म स्वत:ला तपासायचे शास्त्र आहेमी कसे वागावे हे माझ्याच हातात आहेकुठे थांबायचे हे कळणे आवश्यक आहेआनंदचा स्तर उंचावणे हा मोठे होण्याचा निकष आहेजी गोष्ट आपल्या हातात नाही त्याची काळजी केली तर ती चिंता होते आणि ही चिंता चितेवर जाईपर्यंत जाळत राहते.

माणसाच्या आयुष्यात बुद्धी शाश्वत आहे या बौद्धिक पातळीवर जेव्हा त्याला आनंद घेता येईलतेव्हा तो मोठा झाला  बुद्धिपतीपर्यंत पोहोचला असे समजण्यास हरकत नाहीमाणसाला जीवनात ध्यास असणे आवश्यक आहेप्रत्येक गोष्टीतून भरभरून आनंद देताघेता येणे हे माणुसपणाचे लक्षण आहेअसेही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading