अभाविपचे ६८ वे राष्ट्रीय अधिवेशन जयपूरमध्ये उत्साहात संपन्न झाले
पुणे:अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ६८ वे राष्ट्रीय अधिवेशन २७ नोव्हेंबर २०२२, रविवार रोजी महाराणा प्रताप नगर (J.E.C.R.C. विद्यापीठ, जयपूर) येथे उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात देशातील सर्व प्रांतातून एकूण १४८५ कार्यकर्ते उपस्थित होते. ज्यामध्ये ९८६ विद्यार्थी, ३४४ विद्यार्थीनी, १२९ प्राध्यापक आणि 4 इतर कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय मैत्रीपूर्ण देश नेपाळमधील २२ पाहुणे सहभागी झाले होते. देशाच्या ईशान्येकडील राज्ये, मणिपूर, नागालँड आणि मिझोराम पासून ते अंदमान आणि निकोबार, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. सत्राच्या पहिल्या दिवशी (२५ नोव्हेंबर २०२२) उद्घाटन सत्रात योगगुरू स्वामी रामदेवजी प्रमुख पाहुणे होते.
दुसऱ्या दिवशी (२६ नोव्हेंबर २०२२), जयपूर शहरात लघु भारत दर्शन आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये सर्व प्रांतातील अभाविप कार्यकर्त्यांनी त्यांच्या पारंपारिक पोशाखात शोभा यात्रा काढली होती. जयपूरच्या नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत केले. यासोबतच प्रसिद्ध अल्बर्ट हॉल येथे खुले अधिवेशन घेण्यात आले. ज्यामध्ये नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजशरण शाही यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामंत्री श्री. याज्ञवल्क्य शुक्ल व इतर छात्र नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. शेवटच्या दिवशी आदरणीय प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय शिक्षण मंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावर्षी हा पुरस्कार महाराष्ट्रातील बुलढाणा येथील युवा समाजसेवक श्री. नंदकुमार पालवे यांना प्रदान करण्यात आला. निराधार आणि मतिमंदांना पोषण, आरोग्य आणि आपुलकी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याच्या प्रशंसनीय सेवा कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. एक लाख रुपये प्रोत्साहन आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विषयांवर पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री श्री. प्रफुल्ल आकांत यांनी ‘आत्मनिर्भर भारतातील तरुणांची भूमिका’ या विषयावर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह मुकुंद जी सी. आर. यांची ‘वैचारिक प्रवचन स्थापनेमध्ये अभाविपची भूमिका’ या विषयावर भाषणे झाली. आपल्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देणाऱ्या आपल्या पूर्वजांच्या मूर्ती हे संमेलनाचे मुख्य आकर्षण होते. महाराणा प्रताप, स्वामी विवेकानंद, बलिदानी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि श्री गोविंद गुरू इत्यादींचे भव्य आणि सुंदर पुतळे आवारात बसवण्यात आले होते. राणी पद्मिनीची प्रेरणादायी मूर्ती ध्वज फलकाजवळ मातीपासून बनवलेल्या गडावर बसवण्यात आली, जिची प्रतिमा सुंदर मोहक होती. विविध स्वदेशी उत्पादनांचे स्टॉल्सही आकर्षणाचे केंद्र होते. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यशैलीचा परिचय करून देणारा, संमेलनाच्या सभागृहाबाहेर रांगा लावलेल्या शूज आणि चप्पलांचा क्रम लक्ष वेधून घेणारा होता.
अभाविपचे कार्यकर्ते आपापल्या प्रांतात परत जाऊन या पारित प्रस्तावांच्या अंमलबजावणीसाठी वर्षभर काम करतील, तसेच येत्या काही महिन्यांत अभाविप देशभरात स्वावलंबी भारत अभियानासाठी प्रांतांच्या समित्या स्थापन करणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियान सर्व प्रांतांमध्ये व कॅम्पसमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी विवीध कार्यक्रम, कॅम्पसमध्ये उद्योजकता सेलची स्थापना, अभाविपच्या अमृतमहोत्सवाच्या संदर्भात जानेवारी २०२३ मध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व जिल्ह्यांमध्ये परिषद रचना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) सामाजिक समरसता दिन म्हणून कार्यक्रमांचे विशेष नियोजन करणार आहे. तसेच G २० चे भारतात मिळणे या अनुषंगाने विविध प्रकारचे उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी यावेळी दिली.तसेच 2/3 अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २६, २७, २८ मे २०२३ मध्ये पुण्यात होणार आहे, अशी माहिती पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी दिली.
