IND vs ENG Semi Final T20 : किंग कोहली आणि हार्दिक पांड्याने सावरला भारताचा डाव; इंग्लंड समोर 169 धावांचे आव्हान
ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड ओव्हल मैदानात भारत विरूद्ध इंग्लंड असा टी20 विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली तर भारताने प्रथम फलंदाजी केली. सामन्यांच्या सुरूवाती पासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल दाखवत भारतीय संघावर दबाव बनावत भारतीय संघाची धावसंख्या आटोक्यात ठेवली. किंग कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी भारताचा डाव सावरत दमदार अर्धशतकं झालकावली. त्यामुळे भारताची धावसंख्या 6 बाद 168 धावा झाली आहे. ज्यामुळे जिंकण्यासाठी इंग्लंडला आता 169 धावा करायच्या आहेत.
