Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या – उद्धव ठाकरे यांचे चॅलेंज

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. तसेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाचं सरकार स्थापन झालं असून मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आहेत. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संघटनेत चांगलेच सक्रिय झाले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमकपणे उपस्थितांना संबोधित केलं.

“भाजपाकडून शिवसेना संपवण्याचा डाव सुरु आहे. आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर आपलं चुकलं असेल तर जनता आपल्याला घरी बसवेल. जर ते चुकले असतील तर त्यांना घरी बसवेल. हिंमत असेल तर भाजपाने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात.”, असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केलं आहे. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading