ईडी सारख्या कारवाया भाजप करायला लावत नाही – केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर
पुणे: नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने काँग्रेसच्या नेत्या राहुल गांधी यांना पुन्हा समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यावर भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत देशात हे सगळे भाजप काँग्रेस व अन्य पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाया करत आहे असे विरोधी पक्षांचे नेते म्हणत आहेत त्यावर आमची कोणाशी दुश्मनी नाही.ईडी सारख्या कारवाया या भाजप करायला लावत नाही .असे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत वक्तव्य केले.
या पत्रकार परिषदेला भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आज पुणे दौऱ्यावर आले असता .त्यांनी प्रसारमाध्यमांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.
राजीव चंद्रशेखर म्हणाले,ह्या काँग्रेस सरकारने देशाची अर्थव्यवस्था बिघडवली. असा आरोप चंद्रशेखर यांनी काँग्रेसवर केला. भाजप मुळे देशाची आर्थिक प्रगती वेगाने होत आहे असेही चंद्रशेखर म्हणाले. मोदी सरकारने युवकांसाठी किती रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.असा सवाल 5 वर्षापासून सामान्य नागरिक व विरोधी पक्षाचे नेते करत आहेत. त्यावर राजीव चंद्रशेखर म्हणाले,सरकारने युवकांसाठी अनेक संध्या उपलब्ध करून दिल्या. असे चंद्रशेखर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नी गोरगरिबांच्या बँक खात्यात थेट पैसे पाठवणं सुरु केले. त्यामुळे प्रत्येक गोरगरिबांच्या खात्यात दर महिन्याला पैसे येणे सुरू झाले. असे राजीव चंद्रशेखर म्हणाले.