राज्यात पुढील ५ दिवसांमध्ये तीव्र पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा इशारा
पुणे: राज्यात येत्या काही दिवसांमध्ये तीव्र पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस राज्यात धडकणार असल्याचे सांगण्यात येत होते.पश्चिम बंगालमध्ये सुरु झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर गेला आहे. अजून पर्यंत पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांचीसुद्धा चिंता वाढली आहे. परंतु पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये अशी सूचना राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. १२ जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात १२ जूनपर्यंत तीव्र पावसाचा अंदाज आहे. देशाच्या उत्तरेकडे मान्सून पोहोचला आहे. दरम्यान बंगाल, केरळ, तामिळनाडूमध्ये पाऊस दाखल झाला आहे. हळूहळू महाराष्ट्राकडे येत आहे. येत्या ७ दिवसांत महाराष्ट्रात पाऊस दाखल होऊ शकतो. मध्यम, तसेच तुरळक प्रमाणात पाऊस पश्चिम महाराष्ट्र आणि घाट माथ्यावर पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.