fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

राज्यात आणीबाणीसदृश्य परस्थिती; हनुमान चालीसा म्हणण्यात गैर काय? – रावसाहेब दानवे

पुणे : मागील दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर राणा दाम्पत्याचे आंदोलन सुरू आहे. त्यावर राज्यातील कायदा सुव्यवस्था सगळी बिघडली आहे. आमचे आमदार पोलखोल करत आहेत अस राणा दांपत्यच म्हणणं आहे. त्यावर हनुमान चालीसा म्हटलं म्हणून काय झालं. एका नेत्याच्या घरावर मोर्चा जातो तिकडे आंदोलक अटक होते अन दुसऱ्या नेत्याच्या घरापुढे आंदोलका कडे फक्त बघितले जाते. त्यामुळे राज्यात आणीबाणीसदृश्य परस्थिती आहे. त्यामुळे हनुमान चालीसा म्हणण्यात गैर काय? असा सवाल केंद्रीय रेल्वेमंत्री व भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी आपले पुण्यातील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

राज्यात हनुमान चालीसा व विविध गोष्टींवरून वाद होत आहे. त्यावर दानवे म्हणाले,राज्यातील कायदा सुव्यवस्था सगळी बिघडली आहे. असे दानवे म्हणाले.

राज ठकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विशेष रेल्वे मिळणार  

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व मनसे चेकार्यकर्ते पाच तारखेला आयोध्या ला जाणार असून त्यासाठी मनसैनिकांनी आम्हाला जास्तीत जास्त रेल्वे उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली आहे. त्यावर दानवे म्हणाले, मनसेने अयोध्याला जाण्यासाठी रेल्वेची मागणी केली आहे. त्यांना रेल्वे दिली जाईल. तुम्हाला मागितली तरी रेल्वे दिली जाईल, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading