यशवंतराव होळकर यांचा किल्ला राज्य सरकारकने आमच्या ताब्यात द्यावा – गोपीचंद पडळकर
पुणे: वाफ गाव मधील यशवंतराव होळकर यांचा किल्ला राज्य सरकार ताब्यात घेत नाहीये त्यावर वाफगावमधील यशवंतराव होळकर यांचा किल्ला राज्य सरकारने ताब्यात घ्यावा .रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातील किल्ल्याचा आम्ही जीर्णोद्धार करू.किल्ला राज्य सरकारकने ताब्यात द्यावा आणि विकास करा याची आम्ही मागणी राज्य सरकारकडे करणार आहोत असे भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पुण्यातील पत्रकारांना सांगितले.
गोपीचंद पडळकर म्हणाले किल्ल्याचा विकास कसा करायचा याचे ज्येष्ठांचे सुद्धा मार्गदर्शन घेणार आहोत.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी फसवले आहे एसटी कर्मचाऱ्यांनी सदावर्ते यांच्यावर पैसे घेतल्याचा सुद्धा आरोप केला आहे. त्यावर पडळकर म्हणाले, एसटी कर्मचारी बाबत निर्णय झालेला आहे, .एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत आम्ही काल ही होतो आणि आजही आहोत. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फुट पाडण्याचे प्रयत्न केले आहेत, तसेच सदावर्ते यांना विविध मार्गतून अडकवण्याचा प्रयत्न राज सरकार करत आहे. असाही आरोप गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केला.
