आसाम मध्ये अडकलेल्या मुलांना महाराष्ट्र सरकार सुखरूप आणणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
पुणे:आसाममधे अडकलेल्या मुलांशी काल संपर्क झाला आहे.जे करोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांना प्रवास करायला बंधने आहेत, जे पॉझिटिव्ह नाहीत ते प्रवास करु शकतात त्यांना सांगण्यात आल आहे की, काळजी करु नका. महाराष्ट्र सरकार आसाम सरकार बरोबर संपर्क करेल आणि या विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणेल. अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात पत्रकारांना दिली.
ॲट्रोसिटी कायद्यातील बदलाबाबत अजूनपर्यंत कोणताही प्रस्ताव गृह विभागापर्यंत आलेला नाही.जर आला तर याबाबत कोणताही निर्णय झालेला नसताना याबाबत कोणीही संघर्षाची भूमिका घेऊ नये. असे आवाहन वळसे पाटील यांनी केले.
