fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRA

ऊसउत्पादक शेतकरी आणी ऊस वाहतूकदार यांचे औरंगाबाद येथे आंदोलन

औरंगाबाद-जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी पुकारलेल्या उस वाहतुकदार वाहन चालक व मालक यांच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये विविध आंदोलने छेडलेले आहेत त्याची शासनाने व साखर आयुक्तांनी दखल न घेतल्यास त्याचाच एक भाग म्हणून जनशक्ती संघटना औरंगाबादच्या वतीने दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांसह पदाधिकारी जलसमाधी आंदोलन करतील असे निवेदन  सुनील केंद्रेकर, विभागीय आयुक्तऔरंगाबाद यांना यांना प्रत्यक्ष भेटून ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदार वाहन चालक व मालक यांच्यावर होणाऱ्या अन्याय व आर्थिक भुर्दंड याबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले होते‌‌.

या भेटीमध्ये केंद्रेकर यांनी जनशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना असे आश्वासन दिले होते की आपण केलेल्या मागण्या योग्य आणि रास्त आहेत याबाबत मी जातीने लक्ष घालून आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करेल व त्यासाठी माझे पूर्ण सहकार्य असून तुमच्या पाठीशी उभा राहील असेही खरोखरच साखर कारखानदारांचे असलेले वजन काट्या बाबत त्यांनी संशय व्यक्त करून शेतकऱ्यांवर लूटमार करून अन्याय केला जातो आणि याबाबत माझ्याकडे अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यावर होण्याऱ्या अन्यायाबाबत मी तुमच्यासोबत आहे असे आश्वासन दिले होते. त्याची रीतसर दखल घेत विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी साखर आयुक्त पुणे यांना आपल्या अभिप्रायासह पत्र लिहून साखर आयुक्त यांनी आपल्या स्तरावर रास्त असलेल्या मागण्यांची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याबाबत पत्र आपल्या अभिप्रायासह निवेदनाच्या प्रती सोबत पाठवून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केलेले आहे. या निवेदनावर संघटनेचे परदेस महासचिव, रऊफ एन पटेल, जिल्हाध्यक्ष प्रभाकर भुसारे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल शेळके पाटील, जिल्हा संघटक बाबुराव मोरे, जिल्हा सचिव संतोष घाडगे, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष कोळगे पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading