शिवसैनिकांनी केले बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे दुग्धाभिषेकाने शुद्धीकरण
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. शिवसैनिकांनी आता बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दुग्धाभिषेकानं शुद्धीकरण केलं आहे. तसेच स्मृतीस्थळाच्या परिसरात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं आहे. शिवसैनिकांनी केलेल्या शुद्धीकरणावरुन राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
या शुद्धीकरणावर नारायण राणे यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीतील हे सर्वोत्तम काम असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, शिवसैनिकांची भावना पहिलीच चुकीची असती तर त्यांना दर्शन घेऊन दिलं नसते. परंतु शिवसेनेच्या प्रमुखांना नतमस्तक व्हायचे आणि त्यांच्या मुलाची मुख्यमंत्री असताना वाईट शब्दात निंदा करायची तर कुठला सैनिक सहन करणार नाही. जर मुख्यमंत्र्यांना नारायण राणे यांनी येऊच नये असे वाटलं असतं तर त्यांना येऊन दिलं नस्ते. पण त्यांनी तसे केलं नाही. कारण नारायण राणे हे माजी शिवसैनिक आहेत. दर्शन घेतल्यानंतर शिवसेना प्रमुखांना अशा पद्धतीने बोलणार असाल तर हा काही स्टंट उभा केला आहे. अशा अपवित्र विचारांचे लोकं नको यामुळे शिवसैनिकांनी केलं असेल असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.