पुणे शहराला मेट्रो देण्यात सर्वाथा यश मी पवार साहेब आणि अजितदादांच मानतो- प्रशांत जगताप
पुणे : मेट्रो एका दिवसात किंवा महिण्यात उभी राहिली नाही. २००७ साली पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला महापौर बसला तेव्हा राज्यात आघाडी तर केंद्रित युपीए सरकार होत. आणि त्यावेळी सर्व नेत्यांच्या विचार विमर्ष झाल्यावर राज्याच्या कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर करण्यात आला. आणि तेव्हा केंद्रित कृषीमंत्री म्हणून पवार साहेब यांनी आणि सर्व सहकार्यांनी केंद्रीय कॅबिनेटमध्ये २००७ ते २०१४ या काळात ठराव झाले. दुर्दैवाने २०१४ मध्ये सत्ता परिवर्तन झाल्याने मेट्रो मंजुरी शेवटच्या सही साठी विषय राहिला होता. आणि २०१६ मध्ये प्रशांत जगताप राष्ट्रवादीचे महापौर असतानाच या पुणे मेट्रोचे भुमी पूजन केले होते. त्यामुळे मेट्रोच्या सर्व मान्यता या राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असताना झालेल्या आहेत त्यामुळे याच सर्वाथा यश मी अजितदादा आणि पवार साहेबांच मानतो. अस वक्तव्य राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मंडई विद्यापीठ कट्टावर स्पष्ट केले.
आज मंडई विद्यापीठ, पुणे कट्टावर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, मा. महापौर अंकुश काकडे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक वनराज आंदेकर, नितीन कदम, बाळासाहेब बोडके, नीलेश निकम, महेश हांडे, गणेश नलावडे आदी पदाधिकारी आमंत्रित करण्यात आले होते. मंडई विद्यापीठ कट्टा, पुणेचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांच्या वतीने सर्व आमंत्रित मान्यवराचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला.
अंकुश काकडे म्हणाले, शिवसेना भाजपा युती तुटेल अस दोन्ही पक्षातील लोकांना वाटल नव्हत. परंतु मुख्यमंत्री पदाच्या वादावर ती युती तुटली. परंतु हे तोडण्यात राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा हात नव्हता. पवार साहेब तोडण्याच नाही तर जोडण्याच काम नेहमी करतात.
प्रशांत जगताप म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभागात स्वबळावर करण्यासाठी ताकदीने उभी आहे. पण राज्यात आम्ही माहाविकास आघाडी म्हणून सत्तेत आहोत आणि त्यामुळे सर्वप्रथम आमचा प्रयत्न सत्ताधारी व भ्रष्टाचारी भाजपाला सत्तेतून पायउतार करणे आणि उद्याचे सक्षम प्रशासन देण्याकरिता शंभर टक्के राष्ट्रवादीचा महापौर तिथे बसेल, याच्यासाठी आमचे समविचारी पक्ष आमच्या बरोबरीने असतील आणि या सर्व गोष्टींचा सर्वथा निर्णय पक्षाचे श्रेष्ठीजन घेतील आणि त्यांचा निर्णय आम्हाला सर्वतोपरी असेल. असे मत प्रशांत जगताप यांनी कट्टावर व्यक्त केले.
