Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Good News – राज्यात 40 हजार शिक्षकांची होणार भारती, वाचा काय आहे नियोजन

मुंबई : तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ठाकरे सरकारने राज्यातील 40 हजार शिक्षकांच्या भरातीचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक असणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे.  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40  हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार असून पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.

दरम्यान, यापूर्वी टीईटी परीक्षा दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2018-19 मध्ये घेण्यात आली होती. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा दोन वर्ष लांबणीवर पडली होती.

पहिल्या टप्प्यात शिक्षकांच्या 6100 जागा भरणार 

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 8  जुलै रोजी राज्यातील सुमारे 6 हजार 100 शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती दिली होती. त्यानुसार ही पदे भरती प्रक्रिया होणार आहे.  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित,अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक,उच्च प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांतील,शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.कॉलेज) शिक्षकांची सुमारे 6100 रिक्त पदं भरली जाणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading