Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

आलेल्या संकटाला तोंड कसं द्यायचं याचा विचार करत गेल्याने यश मिळाले – माधुरी मिसाळ

पुणे : जेव्हा संकट येते तेव्हा लोकं असा विचार करतात की अरे देवाने हे काय माझ्या नशिबात दिले, पण देव आपल्या साठी जे चांगलं करतो ते आपण लक्षात ठेवत नाही. मी मात्र आलेल्या संकटाला तोंड कसं द्यायचं याचा विचार करत गेल्याने आणि त्या त्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे गेल्याने मला यश मिळाले असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या.
क्रिएटिव्ह फौंडेशन च्या वतीने आज त्यांचा कौटुंबिक सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी त्या बोलत होत्या.त्यांचा सत्कार त्यांच्या शाळेतील 90 वर्षांच्या श्रीमती पद्मा लाहोटी यांच्या हस्ते पुणेरी पगडी, शाल व शतपैलू सावरकर हे पुस्तक देऊन करण्यात करण्यात आला.यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,  सुशील कुलकर्णी,  क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर,उद्यम बँकेचे अध्यक्ष दिनेश गांधी,  राजाभाऊ पाटील, राजन परदेशीं, दिनेश भिलारे,   विनायक कराळे,सचिव श्री शिवकुमार, डॉ. संदीप बुटाला, मा. नगरसेवक दीपक पोटे,  प्रशांत हरसूले, शाम देशपांडे,आरपीआय चे अध्यक्ष वसंतराव ओव्हाळ, बाळासाहेब खंकाळ, प्रतीक खर्डेकर, कल्याणी खर्डेकर, सतीश कोंढाळकर, देवेंद्र भाटिया, विनायक काटकर, राजेंद्र गादिया यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
माझे दीर म्हणतात की “वक्त से पहले और किस्मत से ज्यादा कुछ नहीं मिलता” यावर माझा ठाम विश्वास असून जे घडायचं ते घडतंच त्यामुळे खचून न जाता आलेल्या प्रसंगावर मात करत पुढे जायचे असते असे ही माधुरीताई म्हणाल्या. मी शांतपणे परिस्थिती हाताळायला शिकले ह्याला माझ्या शाळेतील एक प्रसंग कारणीभूत आहे असे सांगताना त्या म्हणाल्या ” की परीक्षेच्या आधी एका विद्यार्थिनीने माझी वही फाडली, तेव्हा माझ्या आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तपस्वी बाई म्हणाल्या की अजून परीक्षेला तीन दिवस आहेत, तू पुन्हा सगळे लिहून काढ, तुझी उजळणी पण होईल, हा प्रसंग माझ्या मनावर कोरला गेला असे माधुरीताई यांनी स्पष्ट केले. तसेच संदीप माझा भाऊ असून आम्ही सगळ्यांनी आयुष्यातील मोठा काळ एकत्र काढल्याचेही त्या म्हणाल्या.
माधुरी ही शाळेत असताना नेहमीच पहिली यायची ती खूप हुशार आणि समजूतदार होती असे त्यांच्या शाळेतील शिक्षिका पद्मा लाहोटी बाई म्हणाल्या.माधुरी चुणचुणीत विद्यार्थीनी होती असे सांगतानाच आज तिचा सत्कार करताना अतीव आनंद होत आहे असेही लाहोटी बाई म्हणाल्या.
माधुरीताईंच्या शिक्षिका शीला कुलकर्णी यांनी देखील मोबाईल वरून त्यांना शुभेच्छा दिल्या. माधुरी प्रामाणिकपणे काम करेल असा विश्वासच नव्हे तर खात्री असल्याचे सांगतानाच तिला अजून यश मिळो असेही आशीर्वाद कुलकर्णी बाईंनी दिले.
माधुरीताई ह्या माझ्या मानलेल्या भगिनी असल्या तरी आमचे नाते हे रक्तापेक्षा ही घट्ट असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले. माधुरीताईंनी जिद्दीने,शांत स्वभावाने आणि संघर्ष करून हे यश मिळविल्याचे सांगतानाच, माझ्याकडे 41 एक्केचाळीस वर्षांचा आठवणींचा खजिना आहे, सुख दुःखाचा काळ एकत्र काढलेले अनेक प्रसंग आहेत, पण हा खजिना तसाच भरलेला राहणे आवडेल, तो रिता होऊ नये याची मी काळजी घेतो असे ही संदीप खर्डेकर म्हणाले.
यावेळी विश्वजित देशपांडे,  मंदार रेडे, दत्तात्रय देशपांडे, विश्वनाथ भालेराव,  राजू दाभाडे, ऍड. अमोल काजळे पाटील, अनिल ताडगे,दुष्यन्त जगताप, चंद्रहास शेट्टी, अभय शास्त्री, गणेश भोसले,  बंटीशेठ निकुडे यासह अनेक संस्था संघटना व मिसाळ कुटुंबियांशी जुना स्नेह असणाऱ्या मित्र परिवाराने त्यांचा सत्कार केला.


Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading