Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

महाराष्ट्रात प्रथमच श्री सीता – रामचंद्र विवाह सोहळा

पुणे : श्री रामजी संस्थान तुळशीबाग यांच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच राजा दशरथ यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रभू श्रीराम आणि राजा जनक यांची ज्येष्ठ कन्या श्री सीतामाई यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा विवाह सोहळा मार्गशीर्ष शुद्ध पंचमी म्हणजेच शुक्रवार, दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी श्रीराम मंदिर तुळशीबाग येथे होणार आहे, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले यांनी दिली.

भक्त कल्याणार्थ हा विवाह सोहळा करण्यात होणार असून, प्रभू श्री सीतारामचंद्र यांचे आशीर्वाद घेण्याकरिता आणि हा विवाह सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याकरिता पुणेकर भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.

भरत तुळशीबागवाले म्हणाले, श्री सीता रामचंद्र विवाह सोहळा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आनंददायी उत्सव आहे. हा सोहळा भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या विवाहाची आठवण म्हणून साजरा केला जातो. हा दिवस धर्म, नीती, आणि कर्तव्याचे प्रतीक आहे. भगवान राम आणि माता सीता यांचा विवाह वैदिक परंपरेनुसार संपन्न झाला होता, जो भारतीय विवाहसंस्थेचा आदर्श मानला जातो. श्रीराम हे धर्माचे प्रतीक असून माता सीता या श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहेत, त्यामुळे त्यांचा विवाह भक्तांसाठी आदर्श सहजीवनाचा संदेश देतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading