पश्चिम महाराष्ट्रात महायुतीस ४५ जागा मिळतील – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
पुणे : पश्चिम महाराष्ट्रात युतीचे ४२ आमदार असून आघाडीचे १६ आमदार आहे.पश्चिम महाराष्ट्रात ४५ जागा आम्ही यंदा निवडून आणू. लोकसभा
Read Moreपुणे : पश्चिम महाराष्ट्रात युतीचे ४२ आमदार असून आघाडीचे १६ आमदार आहे.पश्चिम महाराष्ट्रात ४५ जागा आम्ही यंदा निवडून आणू. लोकसभा
Read Moreपुणे : महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून वाढते जनसमर्थन मिळत असून; आज एका ज्येष्ठ नागरिकाने कवितेच्या माध्यमातून
Read Moreपुणे: कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी कमिन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
Read Moreमुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान, प्रचाराचा झंझावात केला आणि एकूण 64 ठिकाणी त्यांच्या रॅली,
Read Moreपुणे: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदासंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार मनिष आनंद
Read Moreपुणे : सरकारने काय काम केले हे सांगण्याऐवजी भाजपकडून जात-धर्मावर समाजाची विभागणी करण्याचे काम सुरू आहे. भाजपचे नेते जाती-धर्मावरून लोकांमध्ये
Read Moreपुणे : राज्यात आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आरोग्यदूत आमदार सुनील
Read Moreपुणे : तेलंगणामध्ये काँग्रेसने केलेल्या घोषणा सत्ता येताच लागू झाल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, तरुणांना रोजगार, महिलांना मोफत बसप्रवास
Read More‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सर्वांच्या आयुष्यात खळबळ माजवायला आला आहे पंटर पिंट्या आणि समीर निकम. हे दोन वेगळे कलाकार नसून कलाकार आहे, नाव आहे अधोक्षज कऱ्हाडे जो या दोनीही व्यक्तीरेखा साकारत आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अधोक्षजनि आपला उत्साह व्यक्त केला. ” ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत माझ्या भूमिकेचं नाव आहे समीर निकम उर्फ पंटर पिंट्या, नावाप्रमाणे तो अगदीच पंटर आहे. लहानपणापासूनच तो चोरी, पाकीटमारी किंवा कागदपत्र गायब करणे असे छोटे गुन्हे करत आला आहे, आणि यासाठी त्याला अनेकदा जेलमध्ये ही रहावं लागलं आहे. पण तो सराईत गुंडांसारखा क्रूर, दुष्ट नाही. तो मनानी अगदी साधा भोळा, प्रामाणिक आहे पण परिस्थितीमुळे त्याला हा मार्ग स्वीकारावा लागलाय. जालिंदर निंबाळकर उर्फ डॅड्डी यांनी एका विशेष कामगिरीसाठी पिंट्याची जेलमधून सुटका केली आहे. शत्रूला तेजश्रीशी लग्न करायचे आहे, पण तेजश्रीला हे मान्य नाही म्हणून जालिंदरने पिंट्याला म्हणजेच समीर नाईकला उभं केलंय. समीरच लग्न तेजूशी ठरवलं जात. हे पात्र नकारात्मक किंवा साकारातमक आहे असं म्हणता येणार नाही कारण या भूमिकेच्या वेगवेगळ्या शेड्स आहेत. या मालिकेत निवड होण्यासाठी झी मराठीची आणखीन एक मालिका कारणीभूत आहे असं मी म्हणेन, ३-४ वर्षापूर्वी मी ‘घेतला वसा टाकू नको’ नावाची मालिका करत होतो. त्या मालिकेचा क्रिएटिव्ह डायरेक्टर जो या मालिकेवर ही काम करत आहे त्याने माझं काम पाहिलं होतं. त्याने माझं नाव सजेस्ट केले. त्या दिवशी मी सासुरवाडीला कोल्हापूरला निघत होतो. तेव्हाच मला कॉल आला ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेमध्ये एक नवीन भूमिका आहे तुला करायला आवडेल का, मी लगेच होकार दिला. महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शन करून बाहेर येताच माझी निवड झाल्याचा कॉल आला आणि आज रात्रीच तुला साताऱ्याला पोहचायचे आहे. मी रात्रीच प्रवास करून पोहचलो आणि त्याच रात्री माझी लुक टेस्ट झाली आणि दुसऱ्यादिवशी पासून माझं शूटही सुरु झालं. प्रेक्षकांकडून आणि मित्रपरिवाराकडून खूप छान प्रतिसाद मिळत आहे. संकर्षणने माझ्यासाठी खूप छान पोस्ट टाकली होती ज्यामुळे मी ही भूमिका करत आहे हे अधिक लोकांपर्यंत पोहोचलं. जो प्रतिसाद मिळत आहे तो उत्तम आहे, लोक आपल्या कामाची स्तुती करत आहेत तर बरं वाटतंय आणि आता माझी जबाबदारी आहे कि मी अजून छान काम करत रहावं. सेटवर माझं सर्वांशी खूप छान बॉन्डिंग जमायला लागलंय.बरेच कलाकार असे आहेत जे माझ्या ओळखीचे आहेत. गिरीश ओक सरांसोबत मी आधीपण काम केलंय. आणि दिशा जी मालिकेत तुळजाची भूमिका साकारत आहे तिच्या सोबत मी झी मराठीच्या महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शो मध्ये भाग घेतला होतो आणि तिथे आमची जोडी होती. नव्याने सुद्धा चांगल्या ओळखी होत आहेत. मालिकेत शत्रू आणि सुमेधा ताई आहे त्यांच्यासोबत ही छान बॉन्डिंग व्हायला लागलंय. या मालिकेत सगळी कलाकार मंडळी खूप अनुभवी आहेत. बऱ्याच माध्यमातून आलेली आहेत, कुणी थिएटर केले आहे कोणी मालिका केल्या आहेत, कुणी एक पात्र प्रयोग केले आहेत म्हणून प्रत्येकाकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. आऊटडोअर शूटिंग असल्यामुळे आम्ही शूटिंग तर एकत्र करतो पण राहतो ही एकत्र त्यामुळे एकमेकांना अजून जवळून जाणून घ्यायला मिळतंय. पहिला दिवस खूप उत्साहाचा होता, थोडासा धाकधुकीचा ही होता. पंटर पिंट्या ही अगदीच वेगळी व्यक्तिरेखा आहे या आधी मी कधीच अश्या प्रकारची भूमिका केली नव्हती. सर्वात मोठा प्रश्न माझ्यासाठी हा होता कि आपल्याला हे पात्र जमेल का आणि मुळात म्हणजे प्रेक्षकांना हे आवडेल का. पण आमचे दिग्दर्शक आहेत त्यांनी अतिशय छान मला त्याची बॅक स्टोरी समजावली म्हणून हे पात्र करण्यासाठी मदत झाली. सेटवर गिरीश ओक सर होतेच त्यांचा आशीर्वाद घेतला. घरी आई-बाबा , संकर्षणला कॉल केला त्यांना या भूमिकेबद्दल सांगितले, ते म्हणाले मस्त होऊन जाऊ दे. पहिला दिवस जसा आनंदात आणि उत्साहात गेला तसेच पुढचे दिवशी ही असेच जातील याची खात्री आहे. माझ्या छंद, शिक्षण आणि अभिनयाच्या प्रवास बद्दल सांगायचं झाले तर माझं शिक्षण परभणीला झालंय. मी कॉमर्स ग्रॅजुएट आहे. माझ्या अभिनय प्रवासाची सुरुवात २०१५ पासून झाली आणि याचं श्रेयसुद्धा झी मराठीलाच जाईल. २०१४-१५ मध्ये ‘अस्मिता’ नावाची मालिका आली होती त्या मालिकेमध्ये मी जुनियर आर्टिस्ट म्हणून सुरुवात केली. झी मराठीशी एक वेगळंच नातं आहे. फक्त एक कलाकार म्हणूनच नाही तर निवेदक म्हणूनही मी झी मराठीचे बरेच प्रोमोशनल कार्यक्रम केले आहेत. त्याच्यामुळे खऱ्याअर्थाने झी मराठी माझी माय मराठी आहे. मला व्यायाम करायला खूप आवडत. बंजी जम्पिंग, स्कुबा डायविंग, ऍडव्हेंचर स्पोर्ट्स, फोटोग्राफी, रायडींग, फिरायला, गाणी ऐकायला- गायला आणि ड्रायविंग ही आवडत . एक गोष्ट मला माझ्यात कमी वाटते जी कलाकार म्हणून आपण केली पाहिजे, वाचनाची आवड असली पाहिजे. मी हळूहळू ते ही सुरु करतोय. २०२४ वर्ष संपता संपता एक गोड भेट मिळाली आहे ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत काम मिळणं ही सर्वात गोड आठवण आणि भेट आहे . कारण झी मराठीचा प्रेक्षक वर्ग अतिशय मोठा आहे. त्यांचा रिचही वेगळा आहे महाराष्ट्र आणि भारतातच नाही तर परदेशात ही. झी मराठी वर वेगळ्या भूमिकेत, वेगळ्या मालिकेत, नवीन टीम सोबत काम करायला मिळणं ही प्रचंड मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. प्रेक्षकांना मी हेच सांगेन असंच प्रेम करत रहा, माझं काम बघत रहा , आशीर्वाद देत रहा आणि त्यासोबत सूचना ही देत जा, कारण त्या महत्वाच्या असतात.” तेव्हा बघत रहा ‘लाखात एक आमचा दादा’ दररोज रात्री
Read Moreपुणे : “मानव हा निसर्गाचा एक छोटा घटक आहे, हे माणसाने लक्षात ठेवले पाहिजे. निसर्गावर कायमस्वरुपी नियंत्रणाचे प्रयत्न फोल ठरतात.
Read Moreपुणे : नोव्हेंबर महिन्यात येणारा तिसरा रविवार जगभरात रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींचे स्मरण दिवस म्हणून पाळला जातो , वाहन
Read More