Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

इंदिरा गांधी स्मृती दिन – मोदी सरकार’चे दुर्लक्ष, ‘राजकीय असुयेचे’ प्रदर्शन…!!!काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी


पुणे : आज दि ३१ आक्टो हा दिवंगत उपपंतप्रधान व देशाचे १ ले गृह मंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांचा ‘जयंतीदिन’ व देशाची एकता व अखंडते प्रती बलीदान देणाऱ्या स्व इंदीराजी गांधी यांचा ‘स्मृतीदिन’ हा राष्ट्रीय संकल्प दिन साजरा केला जात असतांना… देशाच्या अखंडते साठी ‘खलीस्तानी दहशत वाद्यांशी’ पंगा घेऊन,

त्यांचेवर कारवाई करणाऱ्या तसेच देशास अंतराळ संशोधन, सॅटेलाईट, कृषी व श्वेत क्रांती क्षेत्रात स्वावलंबी बनवणाऱ्या व पाकिस्तान’चे दोन तुकडे करणाऱ्या व ‘आयर्न लेडी’ म्हणून जग-मान्यता मिळवणाऱ्या, भारताच्या १ल्या महीला पंतप्रधान श्रीमती इंदीराजी गांधी यांची हत्या (३१ आक्टो १९८४) झालेला दिवस अर्थात त्यांचा ‘स्मृती दिन’ देशभर साजरा होत असतांना.. तसेच सदर चा स्मृती_दिन ‘राष्ट्रीय संकल्प दिन’ म्हणून मुळात साजरा होत असतांना, हाती असलेल्या सत्तेच्या आघारे ३१ आक्टो हा दिवस नव्याने ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा करून, केवळ राजकीय द्वेषा पोटी दिवंगत पंतप्रधान इंदीराजींचे प्रती सरकार तर्फे आदरांजली न वाहणे.. व जाणीव पुर्वक दुर्लक्ष करणे हे मोदी सरकारच्या राजकीय असुयेचे प्रदर्शन असल्याची प्रखर टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली व मोदी सरकार चा महीला नेतृत्वा विषयी दुजाभाव व असुया देखील स्पष्ट होत असल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, देशाचे पहीले (उप-पंतप्रधान) गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेलांनी महात्मा गांधींच्या हत्ये नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याची भुमिका धेतली व तसे प्रयत्न केले, ही सत्य वास्तविकता असतांना, मात्र मोदी सरकार व भाजप त्यांची जयंती देशभर साजरी करते.. मात्र लोकशाही मुल्यांची व स्वातंत्र्याची जोपासना करणाऱ्या व स्वातंत्र्य संग्रामात अग्रणी असणाऱ्या ज्या पंडीत नेहरूंनी ते मान्य केले नाही, त्यांचे विषयी व नेहरू – गांघी कुटुंबियां विषयी मात्र सतत द्वेष, असुया व्यक्त करते.. ही देशाच्या सत्य – वास्तववादी ईतिहासाशी प्रतारणा असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

देशाच्या सत्य वास्तवादी ईतीहासाचे दिशाभूल करणारे असत्य प्रदर्शन हा लोकशाहीवादी प्रजासत्ताक राष्ट्राकरीता एक प्रकारे राष्ट्रद्रोह असल्याचे कथन देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले व दिवंगत महीला पंतप्रधान श्रीमती इंदीराजी गांधी यांचा अवमान करण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नां बद्दल तिव्र खेद व्यक्त करून निषेध करत असल्याचे ही त्यांनी म्हंटले आहे..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading