Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

…. यामुळे कोल्हे अजित पवारांसह इतरांवर टिका करीत सुटले आहेत – शिवाजीराव आढळरावांचा पलटवार

पिंपरी : सर्वात प्रतिष्ठेची लढत होऊ पाहत असलेल्या शिरूरच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा एकदा निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरदार सुरू केला आहे. मात्र याच दरम्यान आता दोन्ही उमेदवार एकमेकांवर जोरदार टिका टिप्पणी करतांना दिसत आहेत. यातच आढळरावांनी कोल्हेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.

काल शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरी मतदारसंघात आपला प्रचार केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना आढळरावांनी कोल्हेंवर कडाडून टिका केली. अमोल कोल्हे यांच्यामध्येच मीपणा ठासून भरला आहे. त्यामुळेच ते अजित पवारांसह इतरांवर टिका करीत सुटले आहेत. असा पलटवार आढळरावांनी कोल्हेंवर केलाय. अमोल कोल्हे सध्या महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टिका करतांना दिसत आहेत. त्यावर आढळरावांनी प्रत्युत्तर दिलंय.

दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की,  मी कधी थांबायचं हा माझा प्रश्न आहे. मी थांबू नये असा अमोल कोल्हेंचा आग्रह असेल तर आणखी चार निवडणूक लढवतो, असा टोला आढळराव यांनी लगावला.  अमोल कोल्हे हेच माझ्या बोलण्यावरून भावनिक झाले असतील तर मी पुन्हा लढेन. अमोल कोल्हे हे स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात. त्यांना कोण लिहून देतं हे मात्र मला माहीत नाही. अमोल कोल्हेंमध्ये ‘मी’ पणा ठासून भरला आहे. अजित पवारांवर टीका, इतरांवर टीका असं त्यांचं काम सुरू आहे. हा त्यांचा ‘मी’ पणा आहे. हे निवडणूक हातातून निसटल्याचं चिन्ह आहे, असं शिवाजी आढळराव पाटील म्हणाले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading